Maharashtra News LIVE : नारी शक्ती वंदन विधेयकावर आज मतदान, विरोधकांची एकजूट दिसणार?
Maharashtra News LIVE Updates: महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक आज मंजूरीसाठी संसदेत असेल. त्यावर आज सायंकाळी 4 वाजता मतदान होईल. त्यासोबतच देशातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयकही कनिष्ठ सभागृहासमोर सादर करण्यात येईल.

LIVE NEWS & UPDATES
-
मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर; पक्ष संघटना बळकटीकरणावर भर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. संपर्कप्रमुखपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे. त्याकडे राजकीय वर्तुळातून विशेष लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक शक्ती वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात अमित ठाकरे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांशी सविस्तर संवाद साधणार आहेत.
-
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: संशयित निदा खानचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
नाशिकमधील बहुचर्चित TCS कर्मचारी शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणात, मुख्य संशयित आणि फरार असलेली HR मॅनेजर निदा खान हिने अटक टाळण्यासाठी कायदेशीर पाऊल उचलले आहे. निदा खान गरोदर असल्याचा दावा करत तिने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असून, नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तिच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
-
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, कारवरील नियंत्रण सुटले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात आज एक अत्यंत विचित्र आणि थरारक अपघात घडला. भरधाव वेगाने येणारी एक चारचाकी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन धडकली. या भीषण धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने गाडीतील तिघेही प्रवासी सुखरूप असून त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती.
-
ठाण्यात वीस हजार अवैध्य पेट्रोलियम साठा शिधावाटप विभागाच्या वतीने जप्त
16 एप्रिल रोजी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. टँकर मधून कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय सुमारे 20 हजार लिटर डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची बेकायदा वाहतूक सुरू असल्याचे उघड. कोपरी पोलीस ठाण्यात च्या हद्दीत तपासणी दरम्यान आलेसमोर. शिधावाटप अधिकारी आणि कोपरी पोलीस यांच्या संयुक्त कारवाई टँकर आणि एका वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे….
-
पंढरपूर तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस
भोसे येथील रिलस्टार महिला सोनाली नेताजी जाधव (वय 34) हिचा अनैतिक प्रेमसंबंधातून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली ही सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळखली जात होती. काही कौटुंबिक कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहून आपल्या माहेरी भोसे येथे राहत होती……..
-
-
नेकनूरमध्ये बसवलेले महापुरुषांचे पुतळे हटवू नयेत यासाठी शिवप्रेमी आणि भिमसैनिकांचे एकत्रित उपोषण
बीडच्या नेकनूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा रात्रीतुन उभारण्यात आला होता. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील रात्रीतुन उभारण्यात आला होता. या दोन्ही पुतळ्यांमध्ये 100 ते 150 फुटांचे अंतर आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्रित येत या दोन्ही पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र येणाऱ्या काळात आणखी काही महापुरुषांचे पुतळे उभारले जाऊ शकतात तसेच दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे हे पुतळे हटवावेत असे ग्रामपंचायतने तहसीलदारांना पत्र दिलेले आहे. यानंतर पुतळे हटवू नयेत या मागणीसाठी शिवप्रेमी आणि भिमसैनिकांनी एकत्रित येत आंदोलनाला सुरुवात केली आहे.
-
महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट उसळलीये
महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट उसळलीये… आज 17 एप्रिल सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरणार आहे. 23 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी झाला असून 40-44 अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता आहे… नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
-
नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणात मोठी अपडेट
आयटीमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरण. संशयित आरोपींचे सोशल मिडीयावरील गृप्स पोलीस यंत्रणांच्या रडारवर. गृप्स मधील ईतर सदस्य कोण होते ? गृप तयार करण्यामागील नक्की उद्देश काय होता ? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती. धर्मांतरणसाठी दबाव टाकत संबंधित गृप्समध्ये पिडीतांचा समावेश केला जात होता असाही संशय
-
धनंजय सावंत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर
आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात पुतण्या धनंजय सावंत यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. धनंजय सावंत यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्याकडून भावी आमदार अशी बॅनरबाजी करण्यात आली. तानाजी सावंत यांना सोडचिठ्ठी देत धनंजय सावंत अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. धनंजय सावंत कुटुंबाचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत काका तानाजी सावंत यांच्या विरुद्ध धनंजय सावंत आव्हान उभा करणार अशी राजकीय चर्चा होत आहे.
-
बीड जिल्ह्यातील स्त्री जन्मदर पुन्हा घसरला, 1000 मुलांमागे 862 मुली
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा जन्मदर घसरला आहे. 1000 मुलांमागे गेल्या वर्षी 937 मुलींचा जन्मदर होता मात्र यावर्षी मुलींचा जन्मदर पुन्हा घसरला असून एक हजार मुलांमागे 862 मुलींचा जन्म होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून आम्ही सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणार आहोत विनापरवाना कोणी सोनोग्राफी सेंटर चालवत असेल किंवा दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू तसेच पर जिल्ह्यात जाऊन जर कोणी सोनोग्राफी करत असेल तर आम्ही ट्रॅकिंग करू आणि जर कोणी दोषी आढळून येत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू असे सांगण्यात आले आहे.
-
दक्षिण राज्यातील खासदारांची संख्या घटणार?
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पूनर्रचना विधेयकामुळे दक्षिण राज्यांना मोठा फटका बसण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. विरोधकांनी यावरून हंगामा केला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. दक्षिण राज्यांची शक्ती कमी होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमधील खासदार वाढतील असा दावा त्यांनी केला. तर उत्तर भारतातील खासदारांची संख्या अधिक असेल आणि भाजप पुढे अनेक वर्ष सत्तेत असेल असा आरोप विरोधकांनी केला.
-
महिला आरक्षण कायदा २०२३ मध्यरात्रीच लागू
संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमावरून जुगलबंदी रंगलेली असतानाच मध्यरात्री महिला आरक्षण कायदा २०२३ लागू करण्याची अधिसूचना काढण्यात आली. कायदा मंत्रालयाने ही अधिसूचना काढली. त्यातंर्गत १०६ वी घटनादुरुस्ती प्रभावी झाल्याचे म्हटले आहे.
-
संसदेच्या विशेष सत्राचा आज दुसरा दिवस
संसदेचे विशेष सत्र सुरू आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. काल महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या प्रस्तावावरून विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना मतदानाचे आवाहन करत इशाराही दिला. त्यांच्या भाषणापूर्वी विरोधकांनी सरकारच्या हेतूवर मोठा संशय व्यक्त केला. नवीन जनगणनेनंतर हे विधेयक सभागृहात आणण्याचा आग्रह धरला.
-
राजकारणात महिलांचा टक्का वाढणार?
आज 4 वाजता देशात ऐतिहासिक कायद्यासाठी मतदान होईल. नारी शक्ती वंदन विधेयक आज कनिष्ठ सभागृहासमोर असेल. त्यावर मतदान होईल. यासोबतच विधीमंडळ आणि संसदेत लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणारे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरही मतदान होईल. आज देशाचे लक्ष हे संसदेकडे आहे.
महिलांना विधीमंडळात आणि संसदेत 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. हे विधेयक जनगणनेनंतर सादर करण्याची मागणी विरोधकांची आहे. तर केंद्र सरकार ते आताच रेटत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्र सरकार हे विधेयक मंजूर करू इच्छित असल्याचा आणि सरकारचा हेतू योग्य नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासोबतच विधीमंडळ आणि संसदेतील खासदार आणि आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे परिसीमन विधेयकही सादर होणार आहे. तर नाशिकमधील आयटी कंपनीतील कारनामे एकमागून एक समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत उतरले आहेत. तर राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत प्रचार सुरू आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाचा