AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला होता, त्यानंतर तृणमूलला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चेला देखील उधाण आलं आहे.

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?
Mamata BanerjeeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 5:19 PM
Share

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.

नेमकी काय आहे मागणी?

काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. आता तृणमूलची पुढची दिशा काय असरणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?
महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा घणाघात
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग...
'मविआ'ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच...
20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आंदोलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष...
राष्ट्रवादीत मोठा उलटफेर! रोहित पवारांनी सांगितलं 15 दिवसांतच पक्ष घेणार हा निर्णय, विधानाची जोरदार चर्चा
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरणेंचं उत्तर
मामा, तुम्ही शब्द दिला होता...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दत्ता भरणेंचं उत्तर वादात
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर..
ज्यांनी देशातलं सोनं...देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!
नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले..
Sharad Pawar | नेहरूंची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य, शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले...
शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार,
Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?
शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन!
Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण