AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?

भाजप खासदार वरुण गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे.

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?
वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत 3 तास चर्चाImage Credit source: TV9
| Edited By: sagar joshi | Updated on: Mar 29, 2022 | 11:23 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) भाजपमधील (BJP) सख्यही संपूर्ण देशानं पाहिलं आणि आता त्यांचं वैरही देश पाहत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आता नित्याचीच झाली आहे. अशावेळी राष्ट्रीय पातळीवर या दोन्ही पक्षाशी संबंधित एक महत्वाची घटना घडलीय. भाजपचे खासदार मात्र सध्या भाजपपासून स्वत:ला काहीसं दूर ठेवलेले वरुण गांधी (Varun Gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे. वरुण गांधी आणि संजय राऊतांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वरुण गांधी आणि राऊतांमध्ये बैठक पार पडली. मंगळवारी संध्याकाळी ही बैठक झाली. यावेळी दोन्ही खासदारांमध्ये देशपातळीवरील राजकारणावर चर्चा झाली. अलीकडच्या काळात वरुण गांधी यांनी स्वत:ला भाजपपासून काहीसं अलिप्त ठेवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. ते नाराज असल्याचंही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वरुण गांधी भाजपशी काडीमोड घेणार?

खासदार वरुण गांधी हे भाजपमध्ये सध्या नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. ते उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. वरुण गांधी हे सध्या स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशावेळी ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली होती. लखीमपूर हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला होता. गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. अन्नदात्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ती एखाद्या सभ्य समाजासाठी अक्षम्य आहे. आंदोलक शेतकरी आपले बांधव आहेत. काही मुद्द्यांवर आंदोलकांमध्ये रोष असेल आणि ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतील तर त्यांच्याशी संयम आणि धैर्याने वागलं पाहिजे, अशा शब्दात वरुण यांनी योगी सरकारला सुनावलं होतं.

इतर बातम्या : 

‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

Follow Us
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश