AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?

भाजप खासदार वरुण गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे.

भाजप खासदार वरुण गांधी आणि संजय राऊतांमध्ये तब्बल 3 तास चर्चा! नेमकं काय शिजतंय?
वरुण गांधी आणि संजय राऊत यांच्यात दिल्लीत 3 तास चर्चाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 11:23 PM
Share

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) भाजपमधील (BJP) सख्यही संपूर्ण देशानं पाहिलं आणि आता त्यांचं वैरही देश पाहत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आता नित्याचीच झाली आहे. अशावेळी राष्ट्रीय पातळीवर या दोन्ही पक्षाशी संबंधित एक महत्वाची घटना घडलीय. भाजपचे खासदार मात्र सध्या भाजपपासून स्वत:ला काहीसं दूर ठेवलेले वरुण गांधी (Varun Gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आज बैठक पार पडली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळत आहे. वरुण गांधी आणि संजय राऊतांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वरुण गांधी आणि राऊतांमध्ये बैठक पार पडली. मंगळवारी संध्याकाळी ही बैठक झाली. यावेळी दोन्ही खासदारांमध्ये देशपातळीवरील राजकारणावर चर्चा झाली. अलीकडच्या काळात वरुण गांधी यांनी स्वत:ला भाजपपासून काहीसं अलिप्त ठेवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. ते नाराज असल्याचंही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

वरुण गांधी भाजपशी काडीमोड घेणार?

खासदार वरुण गांधी हे भाजपमध्ये सध्या नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. ते उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. वरुण गांधी हे सध्या स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेत असल्याचं पाहायला मिळत आहेत. अशावेळी ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीत झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरुण गांधी यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रंही लिहिलं. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली होती. लखीमपूर हिंसेबाबत वरुण गांधी यांनी योगी सरकारला पत्रं पाठवलं होतं. आंदोलक शेतकऱ्यांवर निर्दयीपणे हल्ला करण्यात आला होता. गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. अन्नदात्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ती एखाद्या सभ्य समाजासाठी अक्षम्य आहे. आंदोलक शेतकरी आपले बांधव आहेत. काही मुद्द्यांवर आंदोलकांमध्ये रोष असेल आणि ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतील तर त्यांच्याशी संयम आणि धैर्याने वागलं पाहिजे, अशा शब्दात वरुण यांनी योगी सरकारला सुनावलं होतं.

इतर बातम्या : 

‘अशी ही बनवाबनवी’ एकदा पहाच; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.