AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये

नेपाळमध्ये महापुराने धुमाकूळ घातला आहे, अचानक आलेल्या या संकटाने नेपाळ उद्ध्वस्त झालं आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता नेपाळनंतर भारतात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Nepal Floods : नेपाळनंतर आता भारतावर मोठं संकट, प्रशासनाचा हाय अलर्ट; एनडीआरएफ, एसडीआरएफ अ‍ॅक्शन मोडमध्ये
nepal floodImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 8:49 PM
Share

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. या महापुरामुळे अनेक इमारती कोसळल्या, पूल पडले. या घटनेत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान भारतामधून फिरण्यासाठी नेपाळलला गेलेले काही भारतीय पर्यटक देखील तिकडेच अडकले आहेत. सरकारकडून या लोकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या महापुराचा फटका आता भारताला देखील बसण्याची शक्यता आहे.

नेपाळच्या महापुराचा फटका हा बिहारला बसला आहे.  गंगा नदीची पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे नदी काठच्या  सखल भागातील झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत. नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात आलेल्या महापुरानंतर त्याचा थेट परिणाम बिहारची राजधानी पटनामध्ये गंगेच्या किनाऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गंगेचा जलस्तर अचानक वाढल्याने नदीकाठच्या सखल भागात वसलेल्या अनेक झोपड्या आणि कच्ची घरे पाण्याखाली गेली आहेत.

नेपाळमधून वाहणाऱ्या गंडक आणि कोसी नद्यांद्वारे पाण्याचा मोठा विसर्ग झाल्यामुळे पाटण्यासह पश्चिम चंपारण, गोपाळगंज आणि सारण जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगेच्या वाढत्या पाण्यामुळे किनाऱ्यावरील रहिवाशांना सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परिस्थिती बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पाटणा आणि आसपासच्या भागात NDRF व SDRF च्या तुकड्यांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, गंगेच्या पाणी पातळीवर 24 तास देखरेख ठेवली जात आहे.

दरम्यान दुसरीकडे  नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे, हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. नागपूरचे सर्व 106 प्रवासी काठमांडूवरून दानापूर (बिहार) करिता सुखरुप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी या प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. हे सर्व लोक जनकपूर (बिहार) बॉर्डरला उद्या सकाळी पोहोचणार आहेत, त्यानंतर ते रेल्वेने गावी परतणार आहेत.

Follow Us
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट... नेमकं सत्य काय?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदत वाढ
देवेंद्र फडणवीस यांची रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीसाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर
कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून...
MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही', अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट