AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताबाबत खळबळजनक दावा, आता थेट घेणार या बलाढ्य देशाची मदत, नेपाळमुळे डोकेदुखी वाढणार

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा बालेन शाह यांनी भारताबाबत मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मार्चमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच संसदेमध्ये बोलत होते.

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताबाबत खळबळजनक दावा, आता थेट घेणार या बलाढ्य देशाची मदत, नेपाळमुळे डोकेदुखी वाढणार
balen shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 4:25 PM
Share

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी रविवारी पहिल्यांदाच नेपाळच्या संसदेमध्ये भाषण केलं. नेपाळमध्ये झालेल्या जेन झीच्या आंदोलनामुळे देशात सत्ता बदल झाला. गेल्या मार्च महिन्यात नेपाळमध्ये निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. दरम्यान बालेन शाहा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे भारतासाठी अडचणीचे ठरणार आहेत. त्यांनी मार्चमध्ये पंतप्रधानपदाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच ते संसदेमध्ये बोलले आहेत. संसदेमध्ये बोलत असताना बालेन शाह यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये नेपाळचं परराष्ट्र धोरण, नेपाळचे भारत आणि चीनसोबत असणारे संबंध अशा गोष्टींवर त्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भारताबद्दल पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. भारतासोबत जो वाद सुरू आहे, त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी पंतप्रधान झाल्यानंतर मला असं कळालं आहे की, फक्त भारतानेच नेपाळच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही तर काही ठिकाणी नेपाळने देखील भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी मिळून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, असं बालेन शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा बालेन शाह यांनी लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी यावर नेपाळचा दावा सांगितला आहे. तसेच हे प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जाऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. नेपाळने यापूर्वीही भारताला एक अधिकृत राजनैतिक पत्र पाठवले आहे, आणि त्यांचं उत्तर देखील मिळालं आहे, असा खुलासाही यावेळी बालेन शाह यांनी केला आहे. भारतासोबत जो जमिनीसंदर्भात वाद सुरू आहे, त्यावर आपण चर्चेद्वारे तोडगा काढू शकतो, यामध्ये केवळ भारतानेच नाही तर ब्रिटश सरकारने देखील लक्ष द्यावं, कारण हे प्रकरण तेव्हापासून सुरू आहे, जेव्हापासून ब्रिटश राजवटीने भारत सोडला होता, आम्ही या संदर्भात ब्रिटश सरकारसोबत देखील चर्चा केली असल्याचं बालेन शाहा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा