AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Session | देश सोडून जाणं एवढं सोपंय? 3 वर्षात 4 लाख नागरिकांनी भारत सोडला, संसदेत महत्त्वपूर्ण माहिती उघड!

भारतातील वाढती लोकसंख्या देखील याचे एक कारण बोलले जाते. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने स्पर्धा देखील जास्त आहे, त्या तुलनेत विदेशात स्पर्धा देखील कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होत असल्याने अनेकजणांची पाऊले विदेशाच्या दिशेने जातात.

Monsoon Session | देश सोडून जाणं एवढं सोपंय? 3 वर्षात 4 लाख नागरिकांनी भारत सोडला, संसदेत महत्त्वपूर्ण माहिती उघड!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 19, 2022 | 3:13 PM
Share

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुसऱ्या दिवशी मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची आकडेवारी संसदेत आज जाहिर केलीयं.  ही आकडेवारी सादर करताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे आणि ही आकडेवारी धक्कादायक आहे. नित्यानंद राय यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019, 2020, 2021 या वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) सोडणाऱ्या भारतीयांची संख्या अनुक्रमे 144017, 85256 आणि 163370 आहे.

इथे पाहा ANI ने शेअर केलेले ट्विट

2021 मध्ये सर्वात जास्त भारतीय नागरिकत्व सोडले गेले

भारतीय नागरिकत्व सोडण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये विदेशात नोकरीची संधी असल्याने अनेकजण तिथेच स्थायिक होतात. तसेच भारतातील वाढती लोकसंख्या देखील याचे एक कारण बोलले जाते. भारतात लोकसंख्या जास्त असल्याने स्पर्धा देखील जास्त आहे. त्या तुलनेत विदेशात स्पर्धा कमी असल्याने सहज नोकरी लागण्यास मदत होत असल्याने अनेकजणांची पाऊले विदेशाच्या दिशेने जातात. तीन वर्षांच्या तुलनेत बघितले तर लक्षात येईल की, 2021 मध्ये सर्वात जास्त भारतीय नागरिकत्व सोडण्यात आले.

तीन वर्षांत तब्बल 3,92,643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले

मंत्री नित्यानंद राय यांच्या आकडेवारीनुसार या तीन वर्षांत तब्बल 3,92,643 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडल्याचे स्पष्ट झाले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज पुन्हा एकदा गोंधळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने आज संसदेबाहेर आंदोलन केले आहे. तर विरोधी पक्षाने महागाई, डेअरी खाद्यपदार्थांवर नव्याने लावण्यात आलेला जीएसटी याचा विरोधात हंगामा केला. संसदेच्या दोन्ही सभागृहात महागाई आणि जीएसटी दरवाढीविरोधात विरोधी पक्षांचा गदारोळ पुन्हा एकदा बघायला मिळाला.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?