AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi speech : नरेंद्र मोदी यांनी ‘या’ पाच मुद्यांवरुन काँग्रेसला घेरले

Narendra modi lok sabha LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी काँग्रेसला घेरले. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील परिस्थिती अन् भाजपच्या काळात देशातील परिस्थिती, यावर भाष्य केले.

PM Modi speech : नरेंद्र मोदी यांनी 'या' पाच मुद्यांवरुन काँग्रेसला घेरले
PM Narendra modi lok sabha speechImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 10, 2023 | 6:36 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावला उत्तर देताना काँग्रेस पक्षाला लक्ष केले. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो, अशी सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाने केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी विरोधकांना विशेषता काँग्रेसला घेरले. लोकसभेतील काँग्रेसने नेते अधीर रंजन चौधरी यांना बोलण्याची संधी दिली नाही. त्यावरुन त्यांनी काँग्रेसला लक्ष केले. आतापर्यंत अविश्वास प्रस्तावाची सुरुवात लोकसभेतील विरोधी पक्षातील नेत्यांकडूनच झाली, त्यासंदर्भातील उदाहरणे त्यांनी दिली.

अधीर रंजन यांना संधी नाहीच…

मोदी यांनी सांगितले की, १९९९ मध्ये वाजपेयी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आला. त्यावेळी त्याचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते. २००३ मध्ये वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळी अविश्वास प्रस्तावाचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी केले. २०१८ मध्ये मल्लिकार्जुन खडगे यांनीच सुरुवात केली. परंतु आता २०२३ मध्ये अधीरजी यांना संधी मिळाली नाही. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करत आहेत. त्यांना कधी निवडणुकीच्या नावाने अस्थायी रुपाने फ्लोअर लिस्टमधून हटवलं जातं. यामुळे आम्ही अधीर बाबू यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, असा चिमटे नरेंद्र मोदी यांनी लगावला.

२०२८ मध्ये काय होणार

देशाची अर्थव्यवस्था १९९१ मध्ये रसातळाला गेली होती. काँग्रेसच्या काळात देश कंगाल झाला. त्यानंतर अथक प्रयत्नाने देश आज नवीन उंचीवर जात आहे. आपली अर्थव्यवस्था आता पहिल्या पाचमध्ये आली आहे. यापुढे २०२८ मध्ये जेव्हा काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाईल तेव्हा देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये असणार आहे.

काँग्रेसवर जनतेचा अविश्वास

देशातील जनतेचा काँग्रेसवर अविश्वास वाढला आहे. काँग्रेस आपल्या अहंकारमध्ये आहे. यामुळे त्यांना जमीन दिसत नाही. तामिळनाडूमध्ये १९६२ मध्ये काँग्रेसचा शेवटचा विजय झाला होता. १९७२ मध्ये शेवटचा विजय पश्चिम बंगालमध्ये झाला होता. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात १९८५ मध्ये शेवटचा विजय मिळाला होता. आडिशामध्ये २८ वर्षांपासून काँग्रेसवर जनता अविश्वास दाखवत आहे. नागालँडमध्ये १९८८ नंतर काँग्रेसला विजय मिळवता आला नाही.

काँग्रेसला स्वत:चा विचार नाहीच

काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व ठिकाणी आपले नावे दिली. सरकारी योजना त्यांच्या नावावर चालवली. रस्ते, रुग्णालये,  शैक्षणिक संस्थांना त्यांची नावे दिली. परंतु काम दिसले नाही. त्या योजनांमध्ये हजारो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. काँग्रेसची एकही वस्तू आपला नाही. काँग्रेसचा निवडणूक चिन्हसुद्धा त्यांचा नाही. ते सुद्धा दुसरीकडून घेतले आहे. काँग्रेसचे विचारसुद्धा त्यांचे नाही. गांधी नावसुद्धा त्यांचे नाही. ते नावही चोरले. काँग्रेस पक्षाचे संस्थापक विदेशी होते.

काँग्रेसमध्ये परिवार वाद

काँग्रेसमध्ये परिवार वाद आहे. या परिवारवादाला महात्मा गांधी यांनी विरोध केला. सरदार पटेल यांनीही परिवार वादाला विरोध केला. परंतु काँग्रेसने आपल्या बेटा, बेटीसाठीच काम केले. काँग्रेसने महान नेत्यांचे अधिकार नेहमी दाबवून ठेवले. ज्यांनी दारबादवादला जोडले नाही, अशा कितीतरी महान नेत्यांना काँग्रेसने मोठे होऊ दिले नाही.

Follow Us
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?.

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?

FIFA World Cup 2026 Final Date, Time in India: अर्जेंटीनाविरुद्ध स्पेन फुटबॉल वर्ल्ड कप फायनलचा थरार, भारतात Live मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार?.

FIFA World Cup 2026 Final Date, Time in India: अर्जेंटीनाविरुद्ध स्पेन फुटबॉल वर्ल्ड कप फायनलचा थरार, भारतात Live मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार?

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’.

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन.

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन