AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odisha Train Accident : ट्रेन नंबर 12841… 250 KM पर्यंत धावल्यानंतर रुळावरून घसरली; 288 जणांचा जागीच मृत्यू

रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता आर्मी आणि एअरफोर्सची टीमही आली आहे. ओडिशा सरकारची स्पेशल रेस्क्यू टीमही बचाव कार्यात मदत करत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 60 रुग्णवाहिका आणि काही बसेस तैनात करण्यात आल्या आहेत.

Odisha Train Accident : ट्रेन नंबर 12841... 250 KM पर्यंत धावल्यानंतर रुळावरून घसरली; 288 जणांचा जागीच मृत्यू
Odisha Train AccidentImage Credit source: ani
| Updated on: Jun 03, 2023 | 10:40 AM
Share

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेनचा विचित्र अपघात झाला आहे. बहनागा स्टेशनजवळ हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात 288 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरोमंडल पश्चिम एक्सप्रेसही पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या हावडा स्टेशन आणि तामिळनाडूच्या चेन्नई दरम्यान धावते. या अपघातानंतर एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार रेल्वे स्टेशनपासून चेन्नई सेंट्रल पर्यंत जाते. ही ट्रेन 1959 किलोमीटरचं अंतर 25 तासात कव्हर करते. शुक्रवारी कोरोमंडल ट्रेन शालीमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 पासून 10 मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी 3.30 वाजता निघाली होती. त्यानंतर काही मिनिटातच ट्रेनने टाईम कव्हर केला. त्यानंतर 253 किमी लांब बाहानगा बाजार रेल्वे स्थानका जवळ अपघात झाला.

5 तासात कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर ट्रेन गेली

3.36 PM: संतरागाची जंक्शन 5.00 PM: खडगपूर जंक्शन 6.30 PM: बालासोर 6.47 PM: नीलगिरी रोड 6.52 PM: खंतरापारा 6.56 PM: पंपाना 8.30 PM: बाहानगा बाजार

रेल्वेचे हेल्पालाईन नंबर

हावड़ा- 033 – 26382217 खडगपूर- 8972073925, 9332392339 बालासोर- 8249591559, 7978418322 शालीमार (कोलकाता) – 9903370746 रेल्वे मदत- 044- 2535 4771

सर्व काही अस्तव्यस्थ

या अपघातानंतर सर्व काही अस्तव्यस्त झालं आहे. रेल्वेच्या डब्यातील परिस्थिती पाहून तर काळीज हेलावून जातं. रेल्वेच्या डब्ब्यात खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, कपडे, चप्पल, बूट आमि एमर्जन्सी अलार्म सर्व काही अस्तव्यस्त पडलेलं आहे. या रेल्वेत अजूनही लोक अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

जखमींसाठी रक्ताची सोय

दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आळी आहे. जखमींना रक्त मिळावं म्हणून लोकांनी रक्तदान केलं आहे. बालासोरमध्ये रात्रभर लोक रक्तदान करत होते. आतापर्यंत 500 यूनिट रक्त डोनेट करण्यात आलं आहे. तसेच 900 यूनिट रक्त स्टॉकमध्ये आहे. त्यामुळे जखमींना त्याचा फायदा होणार आहे.

60 रुग्णवाहिका, बसेस आणि चार हॉस्पिटल

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेस दिले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता आर्मी आणि एअरफोर्सची टीमही आली आहे. ओडिशा सरकारची स्पेशल रेस्क्यू टीमही बचाव कार्यात मदत करत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 60 रुग्णवाहिका आणि काही बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चार रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अपघातात दगावलेल्यांमध्ये सर्वाधिक लोक पश्चिम बंगालमधील आहेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...