Pahalgam Attack: रोगापेक्षा हवा इलाज भयंकर; पहलगाम हल्ल्यातून भारताला धडा काय?
Pahalgam Terrorist Attack : गेल्यावर्षी स्वर्गीय भूमीत पाकिस्तानने दहशतवादी हल्ला घडवला. अनेक निरपराधांचा जीव घेतला. भारताच्या कणखर नेतृत्वाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकला धडा शिकवला. पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणला. या भंयकर रोगावर त्याहून भयंकर इलाज हवा, तरच हा कर्करोग ठीक करता येईल.

Pahalgam Terrorist Attack : गेल्यावर्षी स्वर्गीय भूमीत पाकिस्तानी दहशतवादी घुसले. बैसरन घाटीतील पहलगाम येथे त्यांनी निशस्त्र, निरपराध पर्यटकांची धर्म विचारून हत्या केली. 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानने मानवतेचा मुडदा पाडला.सातत्याने कुरापती काढणार्या पाकिस्तानचे हे प्रॉक्सी वॉर भारताने अनेकदा सहन केले. गेल्यावर्षी मोदी सरकारने या हल्ल्याचा करारा जवाब दिला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर मोठा हल्ला चढवला. तर पाकिस्तानी लष्कराचे कंबरडेही मोडले. पण या भंयकर रोगावर त्याहून जालीम उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. या दहशतवादी हल्ल्यातून भारताने काय धडा घेतला आणि काय धडा शिकवला याचे गणित मांडणे आवश्यक आहे. तरच आपल्याला असे दहशतवादी हल्ले कायमचे रोखता येतील. 26 जणांनी गमावले प्राण function loadTaboolaWidget() { ...
