AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War Situation : हाच भारत-पाकिस्तानमधला मोठा फरक, नुकसान झाल्यानंतर पाकडे आले मूळ औकातीवर

India Pakistan War Situation : भारत आणि पाकिस्तानमध्ये स्थापनेपासूनच मोठा फरक राहिला आहे. आता युद्धसदृश्य परिस्थितीत हा फरक अधिक प्रखरपणे दिसून आलाय. भारताकडून मोठ नुकसान झाल्यानंतर पाकिस्तान आपल्या मूळ औकातीवर आला आहे. त्यांनी जे केलय ते लोकशाहीला धरुन नाहीय.

India Pakistan War Situation : हाच भारत-पाकिस्तानमधला मोठा फरक, नुकसान झाल्यानंतर पाकडे आले मूळ औकातीवर
IAF Image Credit source: X/@IAF
Follow us
| Updated on: May 10, 2025 | 1:21 PM

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये स्थापनेपासून मोठा फरक राहिला आहे. दोन्ही देशांचे स्वभाव, विचार आणि वृत्ती यामध्ये मोठ अंतर आहे. सध्या पाकिस्तानच्या दहशतवाद प्रिय धोरणांमुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच काळात दोन्ही देशांमधला लोकशाही विचारातला मोठा फरक दिसून आला आहे. भारताने लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे, तर पाकिस्तानात सैन्याने बसवलेलं सरकार आहे. पाकिस्तानातल शरीफ सरकार हा नावापुरता लोकशाहीचा चेहरा आहे. प्रत्यक्ष आता वेळ आली, त्यावेळी फरक स्पष्टपणे दिसून आलाय.

पाकिस्तानने 9 आणि 10 मे च्या रात्री भारताची राजधानी दिल्लीला फतेह मिसाइलने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमने त्यांचा हल्ला उधळून लावला. फेतह मिसाइल हवेतच पाडण्यात आलं. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी श्रीनगर एअर बेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण इंडियन एअर फोर्सने त्यांचा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन फायटर जेट्स पाडले.

दृश्य दाखवण्यास बंदी घातली

भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम उडवली तसच त्यांचे चार एअरबेस मिसाइल हल्ल्यात नष्ट केले. आता पाकिस्तानी सैन्य भारतीय हल्ल्यात झालेलं नुकसान लपवण्याच्या रणनितीवर काम करत आहे. पाकिस्तानी मीडिया आपल्या इथे झालेल्या नुकसानीच्या बातम्या कव्हर करत नाहीय. भारतीय हल्ल्याशी संबंधित कोणत्याही बातमीच पाकिस्तानी मीडियामध्ये प्रक्षेपण होत नाहीय. पाकिस्तानी सैन्याने तिथल्या मीडियावर भारताच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची दृश्य दाखवण्यास पूर्णपणे प्रतिबंध घातला आहे.

पाकिस्तानी सैन्याच सोशल मीडियावर काय आव्हान?

पाकिस्तानी सैन्याशी संबंधित अकाऊंटसनी यूजर्सना सोशल मीडियावर फोटो पोस्ट न करण्याच अपील केलय. सोबतच टाकलेले फोटो हटवायला सांगितले आहेत.

याउलट भारताची भूमिका

याउलट भारताने आज पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या हल्ल्यात जे नुकसान झालं, त्याची माहिती सुद्धा दिली. सीमेवर पाकिस्तानकडून जो गोळीबार, बॉम्बफेक सुरु आहे. तिथलं कव्हरेज करण्याची भारतीय पत्रकारांना परवानगी आहे. भारतीय चॅनल्सवर ते दाखवलं सुद्धा जात आहे. पण याउलट पाकिस्तान वागत आहे. हाच भारत आणि पाकिस्तानमधला मोठा फरक आहे.

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.