AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या ‘या’ निर्णयामुळे अख्खा पाकिस्तान होणार बरबाद; मिसाईल हल्ल्यांपेक्षाही मोठं नुकसान, धसका घेतलेल्या पाकचं भारताला पत्र

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्तता आहे.

भारताच्या 'या' निर्णयामुळे अख्खा पाकिस्तान होणार बरबाद; मिसाईल हल्ल्यांपेक्षाही मोठं नुकसान, धसका घेतलेल्या पाकचं भारताला पत्र
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 14, 2025 | 6:54 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्तता आहे. पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगीत केल्यानंतर आता पाकिस्तानने भारताला सिंधू पाणी वाटप करारावरची स्थगिती उठवण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानकडून भारत सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सैय्यद अली मुर्तुजा यांनी भारताच्या जलशक्ती मंत्रालयांच्या सचिवांना पत्र लिहून सिंधू नदी जल वाटप करारावर स्थगिती सारख्या संवेनशील विषयावर पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती केली आहे. भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले होते, मात्र हे नुकसान भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगीत केल्यामुळे होणाऱ्या नुकसानापुढे काहीच नाहीये, कारण भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या संपूर्ण पंजाब राज्यामध्ये दुष्काळ पडू शकतो.

पाकिस्तानने या पत्रामध्ये असं देखील म्हटलं आहे की, जर भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करारावरची स्थगिती उठवली नाही तर पाकिस्तानमधील अनेक भागांमध्ये गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भारतानं आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती आता पाकिस्ताननं भारताला केली आहे. मात्र दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे, रक्त आणि नदी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र वाहू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. भारतानं सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. भारतानं उचललेल्या या पाऊलामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.

भारतानं सिंधू नदी पाणी वाटप करारावरची स्थगिती न उठवल्यास पाकिस्तानच्या अनेक भागांंमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका हा पाकिस्तानला पंजाब राज्यात बसणार आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.