AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणे आणि मतभेदांवर मार्ग काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर टीव्हीवरील चर्चा घेण्यात यावी, असं म्हटलंय.

नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर डिबेट करायचीय, इमरान खान यांचा नेमका प्लॅन काय?
इमरान खान आणि नरेंद्र मोदीImage Credit source: PTI News
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Feb 22, 2022 | 9:57 PM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imarn Khan) यांनी मंगळवारी भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्या प्रस्तावामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणे आणि मतभेदांवर मार्ग काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर टीव्हीवरील चर्चा घेण्यात यावी, असं म्हटलंय. इमरान खान यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर मॉस्कोमध्ये रशिया टुडे या माध्यमाशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मी नरेंद्र मोदी यांच्याशी टीव्हीवर चर्चा करण्यास पसंती देईन, असं ते म्हणाले आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानानंवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. भारतानं त्यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं होतं. तर, दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होऊ शकत नाही, हे भारतानं यापूर्वीचं स्पष्ट केलंय.

पाकिस्तानला व्यापार वाढवायचाय

इमरान खान यांनी भारत हा शत्रुत्व असलेला देश बनला आहे. त्यामुळं भारतासोबतचा व्यापार कमी झालेला आहे. भारत सरकारचं धोरण सर्व देशांशी व्यापार करण्याचं आहे. आशियात पाकिस्तानसमोर व्यापारासाठी मर्यादित पर्याय आहेत, असंही इमरान खान यांनी म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अद्याप या प्रस्तावावर भाष्य केलेलं नाही. इमरान खान यांचे वरिष्ठ सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी भारताशी व्यापार ही काळाची गरज आहे. दोन्ही देशांशी ही गोष्ट फायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. फायनान्शियल अ‌ॅक्शन टास्क फोर्सच्या बैठकीनंतर इमरान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान एफटीएफ टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगवर प्रतिबंध ठेवण्याबाबत पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांची समीक्षा केली जाईल, असं खान यांनी मह्टलं.

दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होऊ शकत नाही

भारतानं गेल्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानला दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकावेळी होऊई शखत नाहीत, असं म्हटलंय. सीमांवरील दहशतवादी कारवाया पाकिस्ताननं थांबवाव्यात असं भारतानं सांगितलं आहे. 2008 मधील दहशतवादी कारवाया,2016 मधील पठाणकोट दहशतवादी कारवायांना जबाबदार असलेल्या संघटनांवर कारवाई करावी, असं देखील सांगितलं आहे. उरी येथील दहशतवादी हल्ला आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळं भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे.

इतर बातम्या :

Mumbai Local : लोकलवरील निर्बंध हटणार नाहीत, लस न घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा नाहीच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेश

आझाद मैदानावर उद्यापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धरणे आंदोलन; किसान मोर्चाचा जाहीर पाठिंबा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...