AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट 'पीएचडी'साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.

पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण
university grants commissionImage Credit source: TV9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Mar 20, 2022 | 8:38 AM
Share

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी (degree) घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या (HSC)चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (university grants commission) वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना 31 मार्चपर्यंत मागविल्या आहेत. बारावीनंतर चार वर्षांचे पदवी शिक्षण घेऊन संशोधन अथवा ऑनर्सची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ला प्रवेश घेता येईल, असा प्रस्ताव ‘यूजीसी’ने आणलाय. त्यामुळे आता पीएचडीचे स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नेमका नियम काय?

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 12वीनंतर पदवी शिक्षण घेताना पहिल्या वर्षात 40 ते 44 श्रेयांक मिळाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र घेऊन शिक्षण सोडू शकतो. तसेच पुढील वर्गात जाऊ शकतो. दुसऱ्या वर्षी 80 श्रेयांकासह शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदविकाधारक होऊन शिक्षण सोडू शकतो. तिसऱ्या वर्षीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. या वर्षात विद्यार्थ्याचा सीजीपीए 7.5 इतका असल्यास विद्यार्थी चौथ्या वर्षी अर्थात संशोधन पात्र ठरतो. पुढे संशोधनाचे शिक्षण पूर्ण झाले की विद्यार्थ्याला पदवी मिळून शकते.

आयोगाचा नवा मसुदा काय आहे?

विद्यापीठ अनुदा आयोगाने पीएचडी पदवीसाठी नवा मसुदा तयार केलाय. यामध्ये चार वर्षे ऑनर्स आणि संशोधनासह पदवीचा मसुदाही प्रसिद्ध झालाय. त्यानुसार 2022-23 या वर्षापासून 4 वर्षे पदवी शिक्षण देण्याची तयारी सुरू केली जाणार आहे. यानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 160 ते 176 श्रेयांक असणं आवश्यक आहे. चार वर्षे शिक्षण घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला एका वर्षात हे शिक्षण घेण्याचीही मुभा आहे. मात्र, तीन वर्षांनंतर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षे पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यावे लागणार आहे. पदवी शिक्षणादरम्यान प्रत्येक श्रेयांकासाठी 45 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिक, इंटर्नशिप, सेमिनार्स अशा पद्धतीने विभागला आहे. या निर्णयामुळे पीचडीचं स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

इतर बातम्या

Madhya pradesh : दोन समाजात तुफान हाणामारी, घटनेत एकाचा मृत्यू, आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, 14व्या शिखर संमेलनातही सहभाग घेणार

Punjab Cabinet: ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचे आदेश; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा