AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट 'पीएचडी'साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.

पदवीनंतर थेट करा PhD, पदव्युत्तर पदवीची गरज नाही, युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण
university grants commissionImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 8:38 AM
Share

पीएचडी करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदची बातमी आहे. आता पदव्युत्तर पदवी न घेता करता पीएचडी करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी (degree) घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या (HSC)चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’साठी (Phd) प्रवेश मिळणे शक्य होणार आहे. यासाठी नियमांत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (university grants commission) वेबसाइटवर प्रसिद्ध केला असून याबाबत सूचना 31 मार्चपर्यंत मागविल्या आहेत. बारावीनंतर चार वर्षांचे पदवी शिक्षण घेऊन संशोधन अथवा ऑनर्सची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण न घेता थेट ‘पीएचडी’ला प्रवेश घेता येईल, असा प्रस्ताव ‘यूजीसी’ने आणलाय. त्यामुळे आता पीएचडीचे स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नेमका नियम काय?

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 12वीनंतर पदवी शिक्षण घेताना पहिल्या वर्षात 40 ते 44 श्रेयांक मिळाल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्र घेऊन शिक्षण सोडू शकतो. तसेच पुढील वर्गात जाऊ शकतो. दुसऱ्या वर्षी 80 श्रेयांकासह शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदविकाधारक होऊन शिक्षण सोडू शकतो. तिसऱ्या वर्षीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. या वर्षात विद्यार्थ्याचा सीजीपीए 7.5 इतका असल्यास विद्यार्थी चौथ्या वर्षी अर्थात संशोधन पात्र ठरतो. पुढे संशोधनाचे शिक्षण पूर्ण झाले की विद्यार्थ्याला पदवी मिळून शकते.

आयोगाचा नवा मसुदा काय आहे?

विद्यापीठ अनुदा आयोगाने पीएचडी पदवीसाठी नवा मसुदा तयार केलाय. यामध्ये चार वर्षे ऑनर्स आणि संशोधनासह पदवीचा मसुदाही प्रसिद्ध झालाय. त्यानुसार 2022-23 या वर्षापासून 4 वर्षे पदवी शिक्षण देण्याची तयारी सुरू केली जाणार आहे. यानुसार चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 160 ते 176 श्रेयांक असणं आवश्यक आहे. चार वर्षे शिक्षण घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला एका वर्षात हे शिक्षण घेण्याचीही मुभा आहे. मात्र, तीन वर्षांनंतर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षे पदव्युत्तर पदवी शिक्षण घ्यावे लागणार आहे. पदवी शिक्षणादरम्यान प्रत्येक श्रेयांकासाठी 45 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिक, इंटर्नशिप, सेमिनार्स अशा पद्धतीने विभागला आहे. या निर्णयामुळे पीचडीचं स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

इतर बातम्या

Madhya pradesh : दोन समाजात तुफान हाणामारी, घटनेत एकाचा मृत्यू, आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, 14व्या शिखर संमेलनातही सहभाग घेणार

Punjab Cabinet: ‘मान’ गये उस्ताद! पहिल्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार पदे तात्काळ भरण्याचे आदेश; Bhagwant Mann यांचा मोठा निर्णय

Follow Us
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....