AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?

Governor R N Ravi : भाजपमुक्त राज्य करण्याच्या नादात काही राज्य भारत मुक्त होण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. काही राजकीय मंडळी ही राज्य देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोपच राज्यपालांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी पण दक्षिण भारतात असे प्रयोग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दक्षिणेतील हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव; राज्यपालांच्या वक्तव्याने देशभर खळबळ, कुणावर केला गंभीर आरोप?
हे राज्य भारतापासून तोडण्याचा डाव, राज्यपालांचा गंभीर आरोप काय?
| Updated on: Oct 19, 2024 | 10:01 AM
Share

राज्यपाल आर एन रवी यांच्या वक्तव्याने तामिळनाडूतच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तीन भाषांच्या सूत्राला तामिळनाडुने विरोध केला आहे. तर देशातील इतर 27 राज्यांनी हे सूत्र स्वीकारले आहे. त्याचवेळी राज्यपालांच्या या विधानाने आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहे. अर्थात राज्यपालांचा रोख कुणाकडे आहे आणि का आहे हे वेगळं सांगायला नको.

राज्यपालांनी टोचले राज्य सरकारचे कान

राज्यपाल आर. एन. रवी यांनी शुक्रवारी हे स्फोटक वक्तव्य केले. हिंदी महिना साजरा करण्याच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी त्यांनी राजकीय पक्षांवर कठोर शब्दात टीका केली. हिंदी लादण्यात येत असल्याचा ते केवळ बहाणा, ढोंग करत आहे. त्यांना भाषेच्या विरोधा आडून संवाद तोडायचा आहे. त्यांची अत्यंत जहाल आणि विषारी धोरण आहे. त्यांना भारतापासून तामिळनाडू राज्याला तोडायचे आहे. पण या कामात त्यांना मिळणार नाही, असे त्यांनी फटकारले.

भारताचे तुकडे करता येणार नाही

तामिळनाडूला देशापासून तोडण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. हे राज्य स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पण असे मनसुबे रचणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की भारताचे तुकडे करता येणार नाही, असे त्यांनी फटकारले. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी शुक्रवारी दुरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हिंदी महिन्याचा समारोपीय कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप केला आहे.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यात संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचे दिसून येते. दोघांमध्ये संघर्ष विकोपाला गेला आहे. कार्यक्रमात राज्य गीत ‘तमिल थाई वज़्थु’ ची एक ओळ राज्यपालांनी म्हटली नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपालांनी राष्ट्रीय एकतेचा अवमान केल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे जात, राज्यपालांवर वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.