AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालकिल्ल्यावरून भारतीयांना कामचुकार, आळशी म्हटलं गेलं; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवत काँग्रेसवर हल्ला चढवलेला पाहायला मिळाला.

लालकिल्ल्यावरून भारतीयांना कामचुकार, आळशी म्हटलं गेलं; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
| Updated on: Feb 26, 2024 | 10:43 PM
Share

नवी दिल्ली :  टीव्ही9 च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या कार्यक्रमातील भाषणाला सुरूवात कली.  नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या काळात झालेल्या कामांची यादी वाचून दाखवली. त्यासोबतच मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला.

लालकिल्ल्यावरून सांगितलं जायचं भारतीय निराशावादी आहे. पराजय भावनेला स्वीकारणारे आहोत. लालकिल्ल्यावरून भारतीयांना आळशी संबोधलं गेलं. कामचुकार म्हटलं गेलं. जेव्हा देशाचं नेतृत्वच नैराश्याने भरलेलं असेल तर देशात आशेचा संचार कसा होईल? त्यासाठी देशातील लोकांनीही ठरवलं होतं, आता देश असाच चालेल. त्यात भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाचं कंबर तोडल्याचं म्हणत काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं आहे. केवळ दहा वर्षात भारत जगाची टॉप फाईव्ह अर्थव्यवस्थेत आला आहे. आज देशात गरजेची धोरणं वेगाने होतात आणि निर्णय त्याच वेगाने घेतले जातात. माइंडसेटच्या बदलाने हे घडवून आणले. २१ व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान,  आज भारताचा विकास पाहून जग हैराण आहे. भारतासोबत चालताना जग स्वतचा फायदा पाहत आहे. भारतात हे झालंय, भारताने हे केलंय, अशा रिअॅक्शन येत आहे. या रिअॅक्शन आजच्या जगाचं न्यूनॉर्मल आहे. वाढती विश्वासहार्य आज भारताची ओळख आहे. दहा वर्षापूर्वीचे आणि आजचे एफडीआयचे आकडे पाहा. मागच्या सरकारमध्ये दहा वर्षात ३०० मिलियनची एफडीआय भारतात आली. आमच्या सरकारच्या १० वर्षात ६४० मिलियन एफडीआय भारतात आली. दहा वर्षात जी डिजीटल क्रांती आली, भारताच्या लोकांचा सरकारवर विश्वास बसत आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.