AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळमध्ये एपीएमसी नाही, मग दिल्लीत फोटो काढण्यापेक्षा तिथे आंदोलन का करत नाही?; पंतप्रधानांचा सवाल

नवी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)

केरळमध्ये एपीएमसी नाही, मग दिल्लीत फोटो काढण्यापेक्षा तिथे आंदोलन का करत नाही?; पंतप्रधानांचा सवाल
| Updated on: Dec 25, 2020 | 1:45 PM
Share

नवी दिल्ली: नवी दिल्लीत सुरू असलेल्या कृषी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. एपीएमसीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. केरळ सारख्या राज्यात तर एपीएमसीच नाही. मग दिल्लीतील आंदोलनात फोटो काढण्यापेक्षा केरळमध्ये जाऊन आंदोलन का करत नाही? असा खरमरीत सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर देशावासियांशी संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. नव्या कायद्यातील एपीएमसीच्या मुद्द्यावरून विरोधक टीका करत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. पण केरळात तर एपीएमसीची व्यवस्थाच नाही. तिकडे शेतकरी नाहीत का? इथे फोटो काढण्यापेक्षा केरळात जाऊन एपीएमसीसाठी आंदोलन करा, एपीएमसीची व्यवस्था जर एवढीच चांगली वाटत आहे तर केरळमध्येही ही व्यवस्था लागू करण्यासाठी आंदोलन का करत नाही? असा सवाल मोदींनी केला. विरोधकांनी खोटं बोलणं सोडावं, शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, दुटप्पी राजकारण करणं सोडा, असंही मोदी म्हणाले.

राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव

शेतकऱ्यांना भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचा विरोधकांचा डाव आहे. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी विरोधक लुडबुड करत आहेत. देशातील शेतकरी विरोधकांची ही चाल जाणून आहे. शेतकरी अशा लोकांना थारा देणार नाही, असं सांगतानाच शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका, त्यांना संभ्रमित करू नका, निर्दोष शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळू नका, असं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं. आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड सामर्थ्य असूनही केवळ याच लोकांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा विकास होऊ शकला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ममता बॅनर्जींनी शेतकऱ्यांना वंचित ठेवलं

यावेळी मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. पीएम किसान योजनेचा देशातील सर्वच राज्यांनी लाभ घेतला आहे. पण पश्चिम बंगाल सरकारने त्याचा लाभ घेतला नाही. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांची योजना रोखून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवलं आहे. केवळ राजकीय स्वार्थासाटी हे चाललं आहे, अशी टीका मोदींनी केली.

बंगाल सरकार विरोधात आंदोलन का नाही?

गेल्या 30 वर्षात बंगालमध्ये सत्ता करणाऱ्या विचारधारेने बंगालची वाट लावली आहे. ममता बॅनर्जींचे 15 वर्षांपूर्वीचे भाषण ऐकल्यावर तुम्हाला कळून येईल. एका विशिष्ट विचारधारेने बंगालची वाट लावली आहे. आता बंगाल सरकार शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेचा लाभही देत नाही. बंगालमध्ये पीएम किसान योजना लागू करण्यात आली नाही, त्याविरोधात विरोधकांनी आंदोलन का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही, त्यावर विरोधक गप्प का? बंगालच्या मुद्द्यावर गप्प राह्यचं आणि पंजाबमधील शेतकऱ्यांची दिशाभूल करायची हे कोणतं राजकारण आहे? असा सवालही त्यांनी केला. (pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)

संबंधित बातम्या:

PM Modi LIVE : केसीसी कार्ड न मिळाल्यास ते प्राप्त करा आणि त्याचा उपयोग करा, मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन

गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल

PM Modi LIVE : पश्चिम बंगाल सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान; मोदींचा नाव न घेता ममतांवर निशाणा

(pm narendra modi challenge Left government over APMC-mandis in Kerala)

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार