AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या सूचना, आता..

इराण आणि अमेरिका यांचे युद्ध टोकाला पोहोचले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. भारतात देखील एलपीजी गॅसचे मोठे संकट आहे. त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मोदींनी आपल्या मंत्र्यांना काही महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या सूचना, आता..
PM Narendra Modi Meeting
| Updated on: May 22, 2026 | 7:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात संकट उभे आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने इंधन पुरवठा विस्कळीत झाला. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवर तणाव आहे. किती नाही म्हटले तरीही कुठे ना कुठे एक तणाव बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट तणाव भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीमध्येही वाढ झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. ज्याने अनेक व्यवसायांवरही परिणाम झाला. महागाई थेटपणे वाढली. लोकांना वेळेवर एलपीजी गॅस मिळत नाहीये. यामुळे दिवसेंदिवस समस्या या वाढतच आहेत. जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. आता या सर्व संकटांवर तोडगा काढण्याकरिता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याकरिता पुढाकार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर होते. भारतात दाखल होताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. ही बैठक दिल्लीत तब्बल 4 तासांपेक्षाही जास्त वेळ सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात आपल्या मंत्र्यांना सांगितले की, एलपीजीचे नवीन पुरवठादार शोधा. होर्मुज खाडीत तणाव आहे, तोपर्यंत भारतात इतर मार्गाने एलपीजी गॅस कसा आणता येईल, यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मोदी सरकार ऊर्जा सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना पर्यायी ऊर्जा स्रोतांवरील कामाला गती देण्याचे आवाहन केले. एलपीजीला पर्याय म्हणून बायोगॅसच्या प्रचारावर भर दिला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, येणारा काळ हा अधिक आव्हानात्मक असू शकतो. भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी जलद पावले उचलावी लागतील.

पश्चिम आशियातील संकट आणि तेल पुरवठ्यावरील संभाव्य धोका लक्षात घेता, सरकार आता दीर्घकालीन धोरणाचा अवलंब करू इच्छिते. सरकारकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, परिस्थिती जागतिक पातळीवर भयंकर आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला