AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली.

Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन
Narendra Modi Tribute to Mahatma Gandhi
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 12:38 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली आहे. न्यूज एजन्सी एएनआयनं नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर केले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पाच वाजता बिर्ला हाऊसला (Birla House) जाणार असून तिथे भजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बिरला हाऊसमध्ये आजच्याच दिवशी 1948 मध्ये नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिवस म्हणून देखील साजरी केली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.

नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे विचार लोकप्रिय करण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त एक ट्विट केलं आहे. महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांचे आदर्श आणि विचारांना लोकप्रिय करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. हुतात्मा दिनाच्या दिवशी मी या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन करतो, त्यांच्या सेवा आणि धैर्याचं कायमच स्मरण केले जाईल, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त राजघाट येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींनी आदरांजली वाहिल्याचे फोटो देखील एनएनआयनं शेअर केले आहेत.

पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय इतर मोठे मंत्री देखील महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते.

अमित शहा यांच्याकडून अभिवादन

गृहमंत्री अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विट केलं आहे. महात्मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वदेशी, स्वभाषा आणि स्वराज्याची प्रेरणा जागवली. त्यांचे विचार आणि आदर्श कायम सेवेसाठी प्रेरित करत राहतील, असं म्हणत अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

प्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात 30 जानेवारी हा दिवस आपल्याला त्यांच्या आदर्शांची आठवण करून देतो, असं म्हटलंय. काही दिवसांपूर्वी आपण प्रजासत्ताक दिन देखील साजरा केला. त्यामध्ये भारताच्या शौर्याचा आणि सामर्थ्याचं जे दर्शन घडलं त्यामुळे आपल्या सर्वांचा उत्साह वाढला असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

त्या दिवशी काय घडलं?

30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी होते. सायंकाळी पाच वाजता सुमारास महात्मा गांधी प्रार्थनेसाठी बाहेर निघाले त्यावेळी ते नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींवर गोळीबार केला. त्यानं तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी दोन गोळ्या महात्मा गांधींच्या शरीरातून आर पार करून गेल्या. एक गोळी महात्मा गांधींच्या शरीरात होती. गोळीबार झाला त्या ठिकाणीच महात्मा गांधींचे निधन झाले.

इतर बातम्या:

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर

Jasprit bumrah: जसप्रीत बुमराहला घडवणारे कोचच म्हणतात, त्याला कॅप्टन बनवू नका, कारण….

PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on his 74 death anniversary

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.