AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. संगम नगरी प्रयागराजमध्ये ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 12:20 PM
Share

लखनऊ: भारताला हिंदू राष्ट्र (hindu rashtra) घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा, या मागण्यांचा प्रस्ताव प्रयागराज धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. संगम नगरी प्रयागराजमध्ये (prayagraj) ब्रह्मर्षी आश्रममध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्म संसदेत (dharma sansad) देशभरातून शेकडो साधू संत सहभागी झाले होते. यावेळी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. भारत हे हिंदू राष्ट्र आहे हे आजपासूनच लिहायला सुरुवात करा. आजपासूनच ही चळवळ सुरू करा, म्हणजे भविष्यात हे आंदोलन मोठं होईल आणि जनतेच्या दबावाखाली सरकारला एक ना एक दिवस झुकावेच लागेल, असं आवाहन या संमेलनात करण्यात आलं. या आव्हानाला सर्व साधू-संतांनी शंखनाद करून आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यामुळे देशभरात भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची चळवळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सव्वा कोटी जनतेने स्वत: भारताला हिंदू राष्ट्र म्हटलं पाहिजे. तसं लिहिण्यास सुरुवात केली पाहिजे. तरच आपलं आंदोलन मोठं होईल. या आंदोलनामुळे सरकारला अखेरीस झुकावेच लागेल. कारण संत संमेलनाचा उद्देशच भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आहे. तसेच इस्लामिक जिहाद दूर करणे आहे, असं या संतांनी सांगितलं.

दोन धर्म गुरूंना तुरुंगातून सोडा

यावेळी भारतातील सर्व मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा मागणीही करण्यात आली. हिंदूच्या मठ आणि मंदिरांचं अधिग्रहण संपुष्टात आणणे आदी प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आले. तुरुंगात बंद असलेले धर्म गुरू नरसिंहानंद गिरी महाराज आणि वसीम रिझवी ऊर्फ नारायण सिंह त्यागी यांना तुरुंगातून लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोणत्याही अटीशिवाय या दोन्ही धर्म गुरूंची सुटका करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं. जिल्हा प्रशासनाने संतांना फोन करून संमेलनात सहभागी होण्यापासून रोखले तसेच त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आणले, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

म्हणून नाव बदललं

दरम्यान, प्रयागराज प्रशासनाच्या दबावानंतर धर्म संसदेचं नाव बदलून संत संमेलन करण्यात आलं आहे. धर्म संसद भरवण्यास प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे त्याचं नाव बदलून संत संमेलन करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार झाहिद वाणीसह पाच अतिरेक्यांचा खात्मा, जम्मू काश्मीर पोलिसांना मोठं यश

‘मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!’ असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?

Supreme Court : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना चाप बसणार; सुप्रीम कोर्ट तातडीने सुनावणी घेण्याच्या तयारीत

Follow Us
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.