AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टच सांगितलं

आता हल्ल्यानंतर मास्टरमाइंडला झोप येत नाही. भारत येणार आणि मारून जाणार हे त्यांना माहीत आहे. हा न्यू नॉर्मल भारताने सेट केला आहे. जगाने पाहिले आहे. आमच्या कारवाईची स्केल किती मोठी आहे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

२२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टच सांगितलं
pm modi in sansad
| Updated on: Jul 29, 2025 | 7:56 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत घेतलेल्या मोहिमेवर संसदेतील सुरु असलेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की याआधी पाकिस्तानशी आपली अनेक युद्धे झालेली आहे. परंतू पण ही पहिली अशी लढाई होती, त्यात अशी रणनीती बनली की ज्यात पूर्वी जिथे कधीच गेलो नाही तिथे आपण गेलो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पहलगाममध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारुन अगदी क्रुरपणे निष्पापांना ठार केले, त्यामुळे देशात दंगली देखील होऊ शकल्या असत्या. परंतू देशवासियांनी धैर्य राखले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानाच्या कोनाकोपऱ्यातले दहशतवादी अड्डे तोडले. दहशतवाद्यांनाही वाटलं नसेल तिथे कोणी येईल. बहावलपूर आणि मुरिकदेलाही आपल्या सैन्याने जमीनदोस्त केले. आपल्या सैन्याने दहशतवादी अड्डे जमीनदोस्त केल्याचे पंतप्रधान यांनी यावेळी सांगितले.

२२ मिनिटात २२ एप्रिलचा बदला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला अंदाज आला होता की भारत काही तरी मोठी कारवाई करणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यूक्लीअर स्फोटाची धमकी दिली होती.परंतू भारताने जसे ठरवलं होतं तशी कारवाई केली. आणि पाकिस्तान काहीच करू शकला नाही. २२ मिनिटात २२ एप्रिलचा बदला निर्धारीत लक्ष्य ठेवून आपल्या सैन्याने बदला घेतला. दुसरी बाजू अशी की पाकिस्तानसोबत अनेकदा लढाई झाली. पण ही पहिली अशी लढाई होती, अशी रणनीती बनली की ज्यात पूर्वी जिथे कधीच गेलो नाही तिथे आपण गेलो असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....