बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

राहुल गांधी मित्रांसोबत दोन दिवसांसाठी जैसलमेरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणार होते. | Rahul Gandhi

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 12:11 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election results 2020) काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जैसलमेरमधील आपली हॉलिडे ट्रिप रद्द करावी लागल्याची माहिती आता समोर येत आहे. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारण सांगत ही ट्रिप रद्द केल्याचे समजत आहे. (Congress leader cancels holiday trip in Jaisalmer)

प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधी मित्रांसोबत दोन दिवसांसाठी जैसलमेरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणार होते. बुधवारी सकाळी त्यांचे विमान जैसलमेरमध्ये दाखल होणार होते. ते पंचतारांकित सूर्यगढ फोर्ट हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती होती.

त्यासाठी हॉटेल प्रशासनाला व्हीआयपी मुव्हमेंटच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूर्यगढ फोर्टमध्ये 10 लोकांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. राहुल गांधी एक रात्र सूर्यगढ हॉटेलमध्ये घालवणार होते. तर दुसरी रात्र ते वाळवंटातील तंबूत घालवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी सूर्यगढ फोर्टमध्ये जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारी राहुल गांधी पुन्हा दिल्लीला जाणार होते.

त्यासाठी राहुल गांधी यांचे विमान आज सकाळी सहा वाजता जैसलमेरमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांना हा प्लॅन कॅन्सल करावा लागल्याची माहिती आता समोर येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये प्रचारासाठी अवघ्या आठ सभा घेतल्या होत्या. राहुल गांधी वगळता राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बिहारच्या प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता.

परिणामी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची वेळ ओढावली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी सुट्टी घालवण्यासाठी जैसलमेरला गेले असते तर काँग्रेसला आणखी टीकेचा सामना करावा लागला असता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ही ट्रिप रद्द केल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, सर्वात मोठा पक्ष ठरुनही राजदचा पराभव

Mp By Election Result | दुधात साखर विरघळावी तसे ज्योतिरादित्य भाजपमध्ये विरघळले : शिवराज सिंह चौहान

(Congress leader cancels holiday trip in Jaisalmer)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.