AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्यावर केंद्राने जबाबदारी झटकत राज्यांकडे चेंडू टोलवला : राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरलंय.

कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्यावर केंद्राने जबाबदारी झटकत राज्यांकडे चेंडू टोलवला : राहुल गांधी
| Updated on: May 02, 2021 | 5:44 AM
Share

नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्गासोबत लढतोय. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत जातेय. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचंही प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरलंय. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी भारत आता जागतिक कोरोनाचं केंद्र बनल्याचं म्हटलं. तसेच आज आपण आपल्या देशात जे पाहतोय ते पाहून जगाला धक्का बसलाय (Rahul Gandhi criticize Modi Government over Corona situation in India).

राहुल गांधी म्हणाले, “कोविड-19 ने पूर्ण उद्ध्वस्त केलंय. ही लाट नाही तर त्सुनामी आहे. या त्सुनामीने सर्वकाही उद्ध्वस्त केलंय. देशातील कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारने कोरोना नियंत्रणाचा चेंडू राज्यांकडे टोलवला आहे. नागरिक खरोखरच आत्मनिर्भर झाले आहेत. देशातील कोरोना स्थितीला पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ते खूप स्वतःवर केंद्रीत होऊन सरकारी यंत्रणेचा उपयोग करत आहेत.”

“मोदी-शाहांनी कोराना व्हायरसचा संसर्ग होण्यालाच प्रोत्साहन दिलंय”

“मोदी स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी नियोजबद्ध योजना आखण्यात आलीय. त्यांचं सगळं लक्ष या योजनेवरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांनी कोराना व्हायरसचा संसर्ग होण्यालाच प्रोत्साहन दिलंय. तसेच त्या कार्यक्रमांचं कौतुकही केलंय. मोदी सरकार अहंकारी सरकार आहे. कोरोनाशी सामना करायचा असेल तर केवळ विनम्र होऊनच लढता येईल. माध्यमं, न्यायपालिका, नोकरशाही अशा कुणीच आपली जबाबदारी पार पाडली नाही. भारत एक असं जहाज आहे जे वादळातही कोणतीही माहिती नसताना प्रवास करतंय,” असंही राहुल गांधींनी नमूद केलं.

हेही वाचा :

यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत, आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी मोदींना डिवचले

‘खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात’, राहुल गांधी गरजले

कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी- ममता बॅनर्जींमध्ये चर्चा; पश्चिम बंगालच्या प्रचारातून काँग्रेसची पूर्णपणे माघार

व्हिडीओ पाहा :

Rahul Gandhi criticize Modi Government over Corona situation in India

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.