AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on PM Modi).

सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला
| Updated on: Aug 16, 2020 | 1:17 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on PM Modi). भारत-चीन सीमेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटेपणाचा आणि भेकडपणाचा आरोप केला आहे (Rahul Gandhi on India China border issue). सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ट्वीट करत त्यांनी हे मत मांडलं.

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, ज्यांच्या भ्याडपणामुळे चीनने आपल्या जमिनीवर ताबा घेतला, ज्यांच्या खोटेपणामुळे ही जमीन आता चीनकडेच राहील अशा पंतप्रधानांना भारतीय सैन्यावर विश्वास नाही.”

चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी सीमा प्रश्न आणि भारतीय सैनिकांच्या बलिदानानंतरही एकदाही चीनचं नाव घेऊन त्यांना सुनावलं नाही, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मोदी सरकार भारत-चीन सीमेवर काय सुरु आहे याची खरी माहिती देत नाही. काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असाही आरोप राहुल गांधींनी केलाय. याआधी राहुल गांधी यांनी याचबाबत काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. यात चीनचं सैन्य भारतीय हद्दीत आतमध्ये आल्याचा दावा करण्यात आला होता.

लडाखमध्ये सीमा वादावरुन चीन आणि भारतात सुरु असलेला वाद अद्याप थांबण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. गलवान खोऱ्यातील तणावाला आता 100 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही चीनकडून आपल्या सैनिकांना मागे घेण्यास टाळाटाळ होत आहे.

भारत-चीन उच्चस्तरावरील बैठकींमध्ये सामंजस्य दाखवत एका ठिकाणावरुन सैन्या मागे घेतल्यास दुसऱ्या ठिकाणावर पुन्हा चिनी सैन्य अतिक्रमण करत असल्याचाही आरोप होत आहे. गलवान खोऱ्यानंतर लडाखच्या पँगोंग तलाव परिसरातही चीकडून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे.

राहुल गांधींच्या या थेट हल्ल्यानंतर आता भाजपकडूनही तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला, यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागेल : राहुल गांधी

गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, सरकार सोनिया-राहुल गांधींना उत्तर देण्यात व्यस्त : सामना

चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

Rahul Gandhi on India China border issue

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.