AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnath Singh : पुन्हा होणार ऑपरेशन सिंदूर ? राजनाथ सिंह काय म्हणाले? Pok बद्दलही…

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या मोरोक्को दौऱ्यात भारत-मोरोक्को संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेच्या मुद्यावरर भर दिला. भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलही भाष्य केले. PoK बद्दल मागणी होत आहे, पण..

Rajnath Singh :  पुन्हा होणार ऑपरेशन सिंदूर ? राजनाथ सिंह काय म्हणाले? Pok बद्दलही...
राजनाथ सिंह
| Updated on: Sep 22, 2025 | 10:08 AM
Share

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या मोरक्को दौऱ्यावर असून नुकतेच ते कासाब्लांका येथे पोहोचले. भारत आणि मोरोक्कोमधील संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने ही भेट एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री द्विपक्षीय चर्चेत सहभागी होणार असून संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. मात्र, त्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला. पाकिस्तानला सुधारणं, त्यांना वठणीवर आणणं हे आपलं काम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी ऑपरेशन सिंदूर भाग 2 आणि 3 असेल, असं ते म्हणाले.

मोरोक्कोमधील भारतीय समुदायाशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “पहलगाममध्ये आपल्या माणसांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं. (त्यानंतर) मी एक बैठक बोलावली आणि त्यांना ऑपरेशनसाठी तयार राहण्यास सांगितले. सर्व प्रमुखांनी सांगितले की ते ऑपरेशनसाठी तयार आहेत.” त्या ऑपरेशननंतर पाकिस्तान म्हणालं की आम्हाला सीझफायर हवं आहे. शेजारच्या देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. मित्र बदलू शकतात, पण शेजारील देश बदलता येत नाहीत. आपल्या शेजाऱ्यांना योग्य मार्गावर परत आणणे ही आपली जबाबदारी आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही त्यांनाही योग्य मार्गावर परत आणत आहोत. एवढंच नव्हे तर ऑपरेशन सिंदूर पुढे ढकलण्यात आले आहे आणि गरज पडल्यास ते पुन्हा सुरू केले जाईल असंही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी ऑपरेशन सिंदूर पार्ट 2-3 होईल

“ऑपरेशन सिंदूरचा दुसरा आणि तिसरा भाग अजूनही प्रलंबित आहेत. ते त्यांच्या (पाकिस्तानच्या) वर्तनावर अवलंबून आहे. जर त्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल.” असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

PoK आपोआप भारतात होईल सामील

ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण मंत्री म्हणाले, “आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या कर्मामुळे मारलं. आम्ही कोणाचाही धर्म विचारला नाही”. “प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्मांचे पालन करतो. आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही” असंही ते पुढे म्हणाले.

पीओके (पाकव्याप्त काश्मीर) स्वतःहून येईल; काळजी का करायची? पीओकेमध्ये मागणी आहे. पीओकेवर आक्रमण करून ते ताब्यात घेण्याची गरज नाही. ते आपलंच आहे. भविष्यात पीओकेचे लोक स्वतः म्हणतील, “मीही भारत आहे.” असंही त्यांनी नमूद केलं.

मोरोक्कोचाही विश्वासघात नको – संरक्षण मंत्री

भारतीय समुदायाशी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “भारताबद्दलचा आपला आदर, आपुलकी आणि प्रेम नैसर्गिक आहे. आपण जगात कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे कधीही विसरू नये.आपण भारतीय असल्याने आपल्या जबाबदाऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. जर आपण मोरोक्कोमध्ये राहत असू, पैसे कमवत असू आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असू, तर मोरोक्कोचा विश्वासघात होऊ नये. हे भारताचे वैशिष्ट्य आहे.” असं त्यांनी नमूद केलं.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.