AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत, वाचा काय आहे नवा सर्व्हे?

सर्वेक्षणानुसार 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 4 ते 8 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 39.4 टक्के मतांसह परत येईल अशी अपेक्षा आहे.

आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत, वाचा काय आहे नवा सर्व्हे?
आप सगळीकडे काँग्रेसची जागा घेतंय? गोव्यात भाजपला कडवं आव्हान देण्याच्या तयारीत
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 11:14 PM
Share

गोवा : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेत परतू शकतो. मात्र आम आदमी पार्टी (आप) राज्यात एक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे, जो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला कडवी लढत देईल. टाईम्स ऑफ इंडियाने एबीपी-सीव्हीटर-आयएएनएस बॅटल फॉर द स्टेट्स प्रोजेक्शनचे हवाले देत म्हटले आहे की, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष भाजप आरामात सत्ता राखेल. (Ready to give a tough challenge to BJP in Goa, read the new survey)

काय आहे सर्वेक्षणात?

हे सर्वेक्षण पाच राज्यांतील 690 विधानसभा जागांवरील 81,006 लोकांसोबत करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार, गोव्यात भाजपचा वाटा 2017 मध्ये 32.5 टक्क्यांवरून 2022 मध्ये 39.4 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये 15.9 टक्क्यांवरून 6.3 टक्के वाढीसह 2022 मध्ये आपचा मतांचा हिस्सा 22.2 टक्के होण्याची अपेक्षा आहे. कॉंग्रेसचा मतांचा हिस्सा 2017 मध्ये 28.4 टक्क्यांवरून 2022 मध्ये 13 टक्क्यांवर येऊन 15.4 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणानुसार 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 4 ते 8 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 39.4 टक्के मतांसह परत येईल अशी अपेक्षा आहे.

प्रमोद सावंत सर्वात प्रबळ दावेदार

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री 2022 मध्ये प्रबळ दावेदार असणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान, सुमारे 33.2 टक्के लोकांनी सांगितले की, प्रमोद सावंत ही त्यांची पहिली पसंती आहे. या सर्वेक्षणातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाने राज्यात अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही, परंतु 13.8 टक्के लोकांनी सांगितले की, मुख्यमंत्री पदासाठी आपचा उमेदवार ही त्यांची पहिली पसंती आहे. सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, भाजप सरकारच्या कामगिरीवर जास्त लोक समाधानी आहेत.

गोव्यात पाण्याचे बिल माफ झाले

काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की लोकांना 16,000 लिटर पाणी मोफत दिले जाईल. 1 सप्टेंबरपासून 60 टक्के कुटुंबांना शून्य बिल मिळेल. फ्लॅट किंवा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्याचबरोबर त्यांनी छोट्या उद्योगांसाठी एक घोषणाही केली आहे. ते म्हणाले, रेस्टॉरंट्सना यापुढे औद्योगिक बिले(Industrial bills) भरावी लागणार नाहीत. आम्ही हे व्यावसायिक बिल स्लॅबमध्ये देत आहोत, ते मोठ्या प्रमाणात पैसे वाचवू शकतील. ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) 2 महिन्यांसाठी वाढविण्यात आले आहे जेणेकरून प्रलंबित बिले भरणे सुलभ होईल.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे म्हणाले होते, ‘लोकांना मोफत पाणी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असेल, आम्ही हे पाणी वाया घालवत नाही, आम्हाला मोफत पाणी मिळवण्यासाठी पाणी वाचवायचे आहे. तसेच, अलीकडेच गोवा सरकारचे ‘गोवा भूमिपुत्र प्राधिकरण विधेयक, 2021’ नावामुळे वादात सापडले. अशा स्थितीत राज्यातील काही समाजांकडून वाढता विरोध पाहून सरकारने विधेयकातून ‘भूमिपुत्र’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. (Ready to give a tough challenge to BJP in Goa, read the new survey)

इतर बातम्या

वीज कोसळली अन् सगळं नेस्तनाबूत, तब्बल 100 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, आम्ही जगावं तरी कसं ? मेंढपाळांचा प्रश्न

50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.