AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan War : पाकिस्तानला धुतल्यानंतर RSS प्रमुख मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया

India-Pakistan War : "दहशतवादी, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करण आवश्यक होतं तसच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेच होतं. त्यामुळे आम्ही या कारवाईच समर्थन करतो" असं आरएसएस प्रमुखांनी म्हटलं आहे.

India-Pakistan War : पाकिस्तानला धुतल्यानंतर RSS प्रमुख मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 09, 2025 | 1:59 PM
Share

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरु आहे. त्यासाठी RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकारच नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या आहेत. “26 हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची भावना होती. देशवासियांना आणि त्या दु:खी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामुळे स्वाभामिन आणि देशाच मनोधैर्य दोन्ही उंचावलं आहे” असं आरएसएसने म्हटलं आहे.

“दहशतवादी, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करण आवश्यक होतं तसच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेच होतं. त्यामुळे आम्ही या कारवाईच समर्थन करतो” असं आरएसएस प्रमुखांनी म्हटलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश सरकार आणि सैन्य दलांसोबत उभा आहे असं आरएसएसने म्हटलं आहे. “भारताच्या सीमेवरील नागरीवसत्या आणि धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. हा अमानवीय हल्ला झेलणाऱ्या पीडितांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलय.

सर्व देशवासियांना आरएसएसने काय आवाहन केलय?

या आव्हानात्मक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासियांना अपील करतो की, सरकार आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांच पालन करा. “नागरी कर्तव्य बजावताना राष्ट्रविरोधी शक्तींमुळे आपलं सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसच लष्कर आणि नागरी प्रशासनाला गरज असेल तेव्हा मदत करण्यासाठी तत्पर रहाण्याची आणि सर्व देशवासियांना राष्ट्रभक्ती दाखवण्याची आरएसएसकडून विनंती करण्यात आली आहे”:

दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.