AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समान नागरी कायदा आणताय, आधी मणिपूरची कायदा सुव्यवस्था राखा; संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल

कोव्हिड सेंटर घोटाळा हे नाटक आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला बदनाम करत आहेत. तुम्ही किती बदनाम आहात ते आधी सांगा, असं संजय राऊत म्हणाले.

समान नागरी कायदा आणताय, आधी मणिपूरची कायदा सुव्यवस्था राखा; संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 1:41 PM
Share

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : मणिपूर येथील हिंसा आणि दोन महिलांची नग्नधिंड निघाल्याच्या प्रकारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात. मणिपूरचा विषय गंभीर आहे. त्यावर यूरोपीयन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. पण मणिपूरच्या विषयावर आपल्या संसदेत चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घटना आहे, असं सांगतानाच तुम्ही समान नागरी कायदा आणताय ना? आधी मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

गेले 70 दिवस होत आले. मणिपूर शांत करता येत नाही. तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवत आहात. आधी मणिपूर शांत करा. मणिपूर हा देशाचा भाग आहे. मणिपूरमधील जनता देशाची नागरीक आहे. मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून मारलं जातंय. ही देशातील 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणता ना? मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

त्याला काय अर्थ आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मणिपूरची हिंसा रोखता आली नाही. त्यामागचं कारण काय असावं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ असतो. कोणत्याही स्वार्थाशिवाय ते काही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. 80 दिवसानंतर पंतप्रधानांनी संसदेबाहेर भाष्य केलं. त्याला काय अर्थ आहे? तुम्ही आधी मणिपूरवर बोला. निर्भयाकांड झालं, तेव्हा संपूर्ण सरकार हलवलं होतं. पण मणिपूरच्या घटनेवर सरकार काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.

घोटाळा झालाच नाही

कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या मुंबईत सर्वच कोव्हिड सेंटरने उत्तम काम केलं आहे. डॉक्टर आणि नर्ससह कोव्हिड सेंटर चालवणारे लोक यांनी चांगलं काम केलं आहे. पेंडामिक अॅक्टनुसार काम केलं आहे. पण काही लोकांच्या पोटात गोळा उठला आहे. चांगलं काम केल्याचं त्यांना पाहवत नाही. लोकांचे जीव वाचवले. चांगलं काम केलं. त्याचा फायदा महापालिकेत आम्हाला होईल. त्यामुळे टार्गेटेड लोकांना पकडलं जात आहे. हा ज्याचा जवळचा तो त्याचा जवळचा आमचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.

परवा अश्लील क्लिप आली. ती व्यक्ती फडणवीस यांच्या जवळची आहे. निकटवर्तीय. पंतप्रधानांच्या जवळचा आहे. मग त्यात त्यांचा सहभाग आहे का? असा सवालही त्यांनी पाटकर यांच्या मुद्द्यावरून केला.

शिंदे गटाने सत्य स्वीकारावं

यावेळी त्यांनी अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला. तुम्हाला खात्रीने सांगतो. ते भावी मुख्यमंत्री आहेत. भावी म्हणजे फार भावी नाहीत. काय घटना घडतात ते मला माहीत आहेत. मलाही राजकारण कळतं. शिंदे गटाने आता सत्य स्वीकारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.