AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल

वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल
sanjay singh
| Updated on: May 22, 2021 | 11:42 AM
Share

नवी दिल्ली: वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. त्यावरून मोदींवर टीका होऊ लागली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भाकिताचं ट्विटही त्यांनी व्हायरल केलं आहे. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचं 17 एप्रिलचं ट्विट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. मी 17 एप्रिल रोजी जे बोललो होतो, ते 21 मे रोजी खरं ठरलं. देशाला एका संवेदनशील आणि नेक व्यक्तीची गरज आहे. ढोगी पंतप्रधानांची नाही. स्वत: रॅली करून कोरोना फैलावायचा आणि नंतर रडण्याचं नाटक करायचं, अशा व्यक्तीची गरज नाही, असं संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हटलं होतं सिंह यांनी

सिंह यांनी 17 एप्रिल रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या पत्रकार परिषदेत ते मीडियाला उद्देशून बोलत आहेत. तुम्ही थोडी कळ सोसा. लवकरच लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन सुरू होणार आहे. फक्त थोडी वाट पाहा. ते टीव्हीवर येऊन रडतील. त्यानंतर संपूर्ण देशातील वृत्तवाहिन्या ही बातमी चालवतील. सर्व भावूक झाले… सर्व रडायला लागले… केवळ टाळ्या-थाळ्या वाजवा… खरच देशाचं भलं व्हावं वाटत असेल तर आता या प्रकारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, असं सिंह या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

अन् मोदी भावूक झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

संबंधित बातम्या:

स्टॉक नसतानाही लसीकरणास सुरुवात; ‘सीरम’ची केंद्र सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम : मनसे

Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

(Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.