AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळ आणि भारतात पुन्हा राजेशाही लागू व्हावी, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची मागणी

ज्योतीष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नेपाळ आणि भारतात राजेशाही लागू करण्याची मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की लोकशाहीमध्ये हिंदू दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनले आहेत.

नेपाळ आणि भारतात पुन्हा राजेशाही लागू व्हावी, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची मागणी
Swami Avimukteswarananda Saraswati
| Updated on: Sep 11, 2025 | 9:24 PM
Share

ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसीत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी नेपाळमध्ये लोकशाहीच्या जागी पुन्हा राजेशाही लागू करण्यची मागणी केली आहे. शंकराचार्य म्हणाले की नेपाळमध्ये जोपर्यंत राजेशाही होती तोपर्यंत कोणतीही गडबड नव्हती. चीनने प्रचंड यांनी उभे करुन नेपाळमध्ये लोकशाहीचा माहौल तयार केला, परंतू जनता आता असंतुष्ठ आहे आणि पुन्हा राजेशाहीची मागणी करत आहे.

शंकराचार्य म्हणाले की हिंदू समाजाची शासन व्यवस्था राजेशाही आहे. यामुळे जगात किमान एक जागा तरी अशी असावी जेथे वेदमंत्रांनी अभिषिक्त राजा राज्य करावा आणि संपूर्ण जगाला दाखवले जाऊ शकेल की आपल्या परंपरेने देखील कल्याण होऊ शकते.

भारतातही राजेशाही लागू करण्याची मागणी

ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावेळी भारतातही लोकशाही ऐवजी राजेशाही लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की भारतात हिंदू बहुसंख्य असूनही दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनला आहे. अल्पसंख्याकांसाठी 300 योजना सुरु आहे. आणि त्यांची प्रत्येक मागणी मान्य होत आहे.तर 100 कोटी सनातनींचे ऐकले जात नाही असेही शंकराचार्य यावेळी म्हणाले.

सनातन हिंदू एकता पदयात्रेचे समर्थन

बिहार निवडणूकीत उतरण्याची घोषणा करताना शंकराचार्य म्हणाले की गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि गोहत्येला दंडनीय अपराध ठरवला जावे. यासाठी आपण प्रत्येक विधानसभा जागेवर अपक्ष उमेदवार उभे करणार आहोत. त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचे समर्थन केले आणि कथावाचकांवरील नियंत्रणासाठी शंकराचार्यांना अधिकार पुन्हा द्यावेत अशी मागणी केली.

नेपाळमध्ये सरकार स्थापणेच्या हालचाली

नेपाळमध्ये गेले काही दिवस अराजक माजले आहे. येथे सोशल मीडिया बंदीवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारणे केले असून निदर्शकांनी प्रचंड विध्वंस केला आहे. नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी राजेशाही होती. त्यानंतर तेथे आलटून पालटून विविध पक्षाची सरकार येत होती. आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापण करण्याच्या हालचाली सुरु असून सुशीला कार्की यांचे नाव पुढे आले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.