सिलीगुडी कॉरिडॉर ही 78 वर्षांची विसंगती, जी 1971 मध्येच दुरुस्त करायला हवी होती – सदगुरू
Sadhguru : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सद्गुरू सन्निधी बंगळूर येथे झालेल्या सत्संगादरम्यान, 'चिकन नेक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलीगुडी कॉरिडॉरबद्दल बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या वक्त्व्याबद्दल प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

29 डिसेंबर 2025 : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी सद्गुरू सन्निधी बंगळूर येथे झालेल्या सत्संगादरम्यान, ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलीगुडी कॉरिडॉरबद्दल बांगलादेशच्या हंगामी सरकारच्या वक्त्व्याबद्दल प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. सिलीगुडी कॉरिडॉर हा भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणारा एक अरुंद भूभाग आहे. सद्गुरूंनी यावर बोलताना म्हटले की, ही 78 वर्षे जुनी विसंगती आहे जी भारताला 1971 मध्ये दुरुस्त करता आली नाही.
सद्गुरूंनी सोशल मीडिया एक्सवर म्हटले की ‘सिलीगुडी कॉरिडॉर ही भारताच्या फाळणीमुळे निर्माण झालेली 78 वर्षे जुनी विसंगती आहे, जी 1971 मध्ये दुरुस्त करायला हवी होती. आता जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाला उघड धोका आहे, तेव्हा या कोंबडीचे संगोपन करून तिला हत्तीमध्ये विकसित होण्याची संधी देण्याची वेळ आली आहे.
Siliguri Corridor is a 78-year-old anomaly created by Bharat’s partition, which should have been corrected in 1971. Now that there is an open threat to the nation’s sovereignty, it is time to nourish the chicken and allow it to evolve into an elephant. -Sg pic.twitter.com/oHyhZ03y4l
— Sadhguru (@SadhguruJV) December 28, 2025
सद्गुरूंनी 1971 च्या मुक्तियुद्धानंतर गमावलेल्या संधींकडे लक्ष वेधले आणि नमूद केले की ही विसंगती दशकांपूर्वीच दुरुस्त करायला हवी होती. त्यांनी म्हटले की, ‘कदाचित 1946-47 मध्ये आपल्याकडे तसे करण्याचा अधिकार नव्हता, पण 72 मध्ये तो अधिकार होता, तरीही ते दुरुस्त करण्यात आलेले नाही. आता या चिकन नेकबद्दल लोक बोलू लागले आहेत, त्यामुळे आता या चिकन नेकचे संगोपन करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून ते लवकरच हत्तीमध्ये विकसित होईल.”
भारताची प्रादेशिक अखंडता मजबूत करण्यासाठी निर्णायक कारवाईची मागणी करताना, त्यांनी म्हटले की, कमकुवतपणा हा कोणत्याही राष्ट्राचा पाया असू शकत नाही. म्हणूनच राष्ट्रे फक्त कोंबडीसारखी राहून बनू शकत नाहीत. तिला हत्तीसारखे वाढले पाहिजे. कदाचित त्याला पोषणाची गरज आहे. कदाचित त्याला काही स्टेरॉइडची गरज आहे. जे काही आवश्यक असेल, ते आपण केले पाहिजे. आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतो, त्याची काहीतरी किंमत असते, नेहमीच काहीतरी किंमत चुकवावी लागते, असेही सद्गुरूंनी म्हटले आहे.
सद्गुरूंनी हा मुद्दा व्यापक जागतिक आणि सभ्यताविषयक संदर्भात मांडताना असे निरीक्षण नोंदवले की, सीमाविरहित जग ही एक आकांक्षा असली तरी, ती अकाली लादली जाऊ शकत नाही. जगात राष्ट्रे नसती, जगात सीमा नसत्या तर किती छान झाले असते. पण आपण अजूनही अस्तित्वाच्या त्याच पातळीवर आहोत. उद्या आपण अचानक सर्वांना मिठी मारून आनंदाने जगू, अशी कल्पना आपण लगेच करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत हा एक मूर्खपणाचा विचार आहे.’
असो, ही विसंगती फक्त 78 वर्षांपूर्वी घडली आहे. काही सुधारणा आवश्यक आहे. सुधारणा व्हायलाच हवी. मला वाटते की आपण कोंबडीला चांगले खायला घालून तिचा हत्ती बनवले पाहिजे. हत्तीची मान सांभाळणे सोपे जाईल असंही सद्गुरूंनी सांगितले आहे.
सद्गुरूंनी यापूर्वी अनेकदा बांगलादेशातील घडामोडींबद्दल सार्वजनिकपणे भाष्य केले आहे, विशेषतः हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटना आणि मंदिरांच्या विनाशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी हिंदूंवरील हिंसाचार, मंदिरांचा विनाश आणि अल्पसंख्याकांना पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय दबावाबाबतच्या प्रदीर्घ शांततेवर सार्वजनिकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फाळणीच्या वेळी निर्माण झालेल्या न सुटलेल्या सभ्यताविषयक आणि भू-राजकीय समस्यांमधून अशा समस्या उद्भवत असताना, त्यांना अंतर्गत बाबी म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
