AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाची नांदी; सोनिया गांधींच्या मर्जीतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक

बिहारमधील पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. | congress Special Committee

बिहार निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाची नांदी; सोनिया गांधींच्या मर्जीतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक
| Updated on: Nov 17, 2020 | 7:45 AM
Share

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात निर्माण झालेल्या सुप्त तणावाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मदतीसाठी पक्षाकडून नेमण्यात आलेल्या विशेष समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीचा अजेंडा स्पष्ट करण्यात आला नसला तरी बिहार निवडणुकीतील पराभव आणि पक्षातंर्गत उमटत असलेले त्याचे पडसाद या बाबींवर बैठकीत आत्मचिंतन होण्याची शक्यता आहे. ही बैठक दुपारी पाज वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडेल. (Amid war of words among party leaders on Bihar polls byelections Congress Special Committee to meet today)

बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह 23 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांच्याकडे पक्षनेतृत्वाविषयी नाराजीही व्यक्ती होती. त्यामुळे सिब्बल यांच्या टीकेनंतर ही लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच काँग्रेसकडून आता बिहार निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या विशेष समितीमध्ये अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, ए.के. अँटोनी, अंबिका सोनी, मुकूल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला हे गांधी घराण्याच्या मर्जीतील नेते आहेत. आजच्या बैठकीनंतर हे नेते सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधू शकतात. त्यामुळे आजच्या बैठकीत या नेत्यांना पक्षातील नाराजीवर तोडगा काढण्यात यश मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, यापैकी केवळ 19 जागांवरच पक्षाला विजय मिळाला. तर गुजरातमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. ही बाब काँग्रेस पक्षासाठी चिंताजनक मानली जात आहे.

संबंधित बातम्या:

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

लोकांना आमच्याकडून आशा उरलेल्या नाहीत; काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल

(Amid war of words among party leaders on Bihar polls byelections Congress Special Committee to meet today)

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.