AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष

शेतकऱ्यांशी बुधवारच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मंगळवारी बैठक झाली. | Farmers protest

Farmers Protest: मोदी सरकार आणि शेतकऱ्यांमधील निर्णायक चर्चेकडे साऱ्या देशाचे लक्ष
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 30, 2020 | 8:07 AM
Share

नवी दिल्ली: कृषी कायदे रद्द (Farm laws) करण्याच्या मागणीसाठी गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बुधवारी निर्णायक चर्चा होणार आहे. दुपारी दोन वाजता दिल्लीच्या विज्ञान भवनात शेतकरी प्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात शेतकरी आंदोलकांना (Farmers protest) चर्चेसाठी जाहीर निमंत्रण दिले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत केंद्र सरकारकडून काही सकारात्मक पाऊल उचलले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Farmers and Central govt meeting will be held in Delhi today)

तत्पूर्वी मंगळवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या बैठकांचा आढावा घेतला. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची बुधवारची बैठक आटोपल्यानंतर आपण अन्य नेत्यांशी बोलून संयुक्त पुरोगामी आघाडीची (UPA) भूमिका स्पष्ट करु, असे शरद पवार यांनी सांगितले.

अमित शाह आणि नरेंद्रसिंह तोमर यांची बैठक

शेतकऱ्यांशी बुधवारच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची मंगळवारी बैठक झाली. त्यात केंद्र सरकारची भूमिका निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी दुपारी 2 वाजता बैठकीला बोलावले आहे. 40 शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून मंगळवारी बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा आणि किमान आधारभूत मूल्याला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या अटीसह अन्य काही मुद्दय़ांचा समावेश होता.

मात्र, सरकार हमीभाव आणि कृषी कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने ही बैठक निष्फळ ठरण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील दिशा 1 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरचे आंदोलन तीव्र असेल, असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

रेशनपाणी, तेल, कपडे-चपला मिळणार मोफत, सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी उघडला मॉल

शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…

‘अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता’

(Farmers and Central govt meeting will be held in Delhi today)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...