AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता’

अरुण जेटली आज हयात असते तर शेतकरी ज्याप्रकारे समस्यांचा सामना करत आहेत, आंदोलन करत आहेत, ते इतक्या दीर्घकाळ सुरु राहिले नसते. | Sushil Modi

'अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर एव्हाना तोडगा निघाला असता'
| Updated on: Dec 29, 2020 | 8:01 AM
Share

पाटणा: अरुण जेटली (Arun Jaitley) आज असते तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) एव्हाना तोडगा निघाला असता, असे वक्तव्य भाजप नेते सुशील मोदी (Sushil Modi) यांनी केले आहे. कृषी कायद्यांवरून चहुबाजूंनी घेरल्या गेलेल्या भाजपसाठी हा एकप्रकारे घरचा आहेर मानला जात आहे. (Farmers protest would not continued if Arun jaitley been alive says Sushil Modi)

सुशील मोदी यांनी सोमवारी अरूण जेटली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोदी यांनी म्हटले की, अरुण जेटली आज हयात असते तर शेतकरी ज्याप्रकारे समस्यांचा सामना करत आहेत, आंदोलन करत आहेत, ते इतक्या दीर्घकाळ सुरु राहिले नसते. अरूण जेटली यांनी त्यावर एव्हाना नक्कीच काहीतरी तोडगा काढला असता, असे सुशील मोदी यांनी म्हटले.

सुशील मोदी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी सध्या दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय विरोधकांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. अशात सुशील मोदी यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळू शकते.

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये उद्या महत्त्वाची बैठक

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी दुपारी 2 वाजता बैठकीला बोलावले आहे. 40 शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून मंगळवारी बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यात तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा आणि किमान आधारभूत मूल्याला (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या अटीसह अन्य काही मुद्दय़ांचा समावेश होता.

मात्र, सरकार हमीभाव आणि कृषी कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने ही बैठक निष्फळ ठरण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे तोडगा न निघाल्यास आंदोलनाची पुढील दिशा १ जानेवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरचे आंदोलन तीव्र असेल, असे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! कांदा निर्यातीवरील बंदी उठवली, केंद्राचा मोठा निर्णय

शरद पवारांची केंद्र सरकारला डेडलाईन; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढा नाही तर…

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करेन; अण्णा हजारेंचा केंद्राला इशारा

(Farmers protest would not continued if Arun jaitley been alive says Sushil Modi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.