दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेलंगणाहून 20 भाविकांचा जत्था गेला होता. त्यापैकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Telangana people who attended Nizamuddin congregation Dies of Coronavirus)

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 7:51 AM

नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेलेल्या तेलंगणामधील सहा जणांचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक भाविक उपस्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. (Telangana people who attended Nizamuddin congregation Dies of Coronavirus)

दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेलंगणाहून 20 भाविकांचा जत्था गेला होता. त्यापैकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तेलंगणा सरकारने दिली.

13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या मर्कजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणामधील सहा जणांचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला. गांधी हॉस्पिटलमध्ये दोघांचा, तर अपोलो हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, निजामाबादमधील रुग्णालय आणि गडाडवालमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, असं परिपत्रक तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलं आहे.

हेही वाचा : Corona : आपण कोरोना विषाणूच्या ‘स्टेज थ्री’च्या उंबरठ्यावर, प्रदीप आवटेंचा इशारा

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी आपणहून पुढे यावे, त्यांना कोणी काहीही बोलणार नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्यावर विनाशुल्क उपचार केले जातील, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार केली आहेत. ही पथकं दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा शोध घेतील.

एकाएकी सहा रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू होणं, ही तेलंगणासाठी चिंतेची बाब आहे. ​​मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कालच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं जाहीर केलं होतं. नवीन प्रकरण समोर न आल्यास तेलंगणा 7 एप्रिलपर्यंत ‘कोरोना’मुक्त होईल, असा दावा त्यांनी केला होता. एका व्यक्तीव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचेही ते म्हणाले होते.

(Telangana people who attended Nizamuddin congregation Dies of Coronavirus)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.