AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरच्या उपचारावरील ही तीन जीवनावश्यक औषधे झाली स्वस्त, सरकारचा मोठा निर्णय

लान्सेटच्या एका अभ्यासानुसार भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या 14 लाखांहून अधिक झाली आहे. दरवर्षी त्यात दुर्दैवाने वाढ होत आहे. साल 2020 मध्ये ही संख्या 13.9 लाख होती. साल 2021 मध्ये ती 14.2 लाख झाली. तर साल 2022 मध्ये रुग्णांची संख्या 14.6 लाखावर पोहचली.

कॅन्सरच्या उपचारावरील ही तीन जीवनावश्यक औषधे झाली स्वस्त, सरकारचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 29, 2024 | 8:07 PM
Share

देशात जीवनाश्यक औषधे सर्वसामान्यांना स्वस्तात मिळावीत यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णाला दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी महत्वाची तीन औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. या संदर्भात सरकारने आदेश देखील काढले आहेत. देशात जीवनावश्यक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( NPPA ) करत असते. आता एनपीपीएने कॅन्सरवर उपचारासाठी वापरली जाणारी ट्रॅस्टुजुमाब, ओसिमर्टिनिब आणि डुर्वालुमाब या औषधांची एमआरपी कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णांना दिलासा दिला आहे. ब्रेस्ट आणि फुप्फुसाच्या कॅन्सरवरील उपचारासाठी वापरली जाणारी तीन प्रमुख औषधांचा समावेश आहे. यातील ट्रॅस्टुजुमाब या औषधाचा वापर स्तनाच्या कॅन्सरमध्ये केला जातो. तर ओसिमर्टिनीब या औषधाचा वापर फुप्फुसाच्या कॅन्सरसाठी केला जातो. आणि डुर्वालुमाब या औषधांचा वापर दोन्ही प्रकारच्या कॅन्सरसाठी केला जातो.

सर्वसामान्यांना जीवनावश्यक औषधे स्वस्तात मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे असे सरकारने म्हटले आहे. एनपीपीए देखील औषधांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. तर अलिकडेच या औषधांवरील जीएसटी दर कमी केले होते. तर केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये या औषधांवरील कस्टम ड्यूटी संपविण्याची घोषणा केली होती.

करातील कपातीचा परिणाम औषधांच्या किंमतीवर देखील होणार आहे. त्यामुळे सरकारने औषधांची एमआरपी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने या वर्षी 23 जुलै रोजी एक अधिसूचना जारी करीत तीन औषधांवरील सीमा शुल्क शून्य केले होते.

10 ऑक्टोबर 2024 पासून दर कमी

अलिकडे सरकारने या औषधांवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरुन 5 टक्के केली आहे. त्यामुळे कंपन्यांनी एमआरपी 10 ऑक्टोबर 2024 पासूनच कमी करायची होती. कारण नवीन एमआरपी याच दिवसांपासून लागू होणार आहे. उत्पादकांना एमआरपी कमी करणे आणि डिलरना, राज्य औषध नियंत्रकाना आणि सरकारला मूल्य परिवर्तनाची माहिती देण्याचे आदेशही दिले आहेत.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.