AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?

टीवी9 च्या सत्ता संमेलनादरम्यान बाबा रामदेव यांनी राहुल गांधी यांच्या फिटनेसवर टिपण्णी केली. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सामर्थ्यावर भर देत "बलवान व्हा" हा मंत्र दिला. पतंजली जगातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनेल असा दावा बाबा रामदेव यांनी केला.

TV9 Satta Sammelan : बाबा रामदेव आणि राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही ? TV9 सत्ता संमेलनात योग गुरूंचं उत्तर काय ?
बाबा रामदेव
| Updated on: Mar 24, 2026 | 12:31 PM
Share

TV9 भारतवर्षचं सत्ता संमेलन सुरू असून त्यामध्ये बाबा रामदेव सहभागी झाले होते. यावेळी ते विविध विषयांवर बोलले. या देशात अशी दोन लोकं आहेत ज्यांना थंडी वाजत नाही पहिले तुम्ही आणि दुसरे म्हणजे राहुल गांधी ?  त्यावर रामदेव बाबा म्हणाले की, ‘ मी कॉफी, चहा पीत नाही, ड्रिंकही घेत नाही. ना मी जिममध्ये जातो ना परदेशात. कोणत्याही पद्धतीचे गुप्त संबंध ठेवत नाही. माझं आयुष्य पूर्णपणे खुलं आहे. आतला हीटर कसा चालू करायचा हे मला माहीत आहे. जर खूप थंडी असेल, तर मी योगा करतो. पाच मिनिटांत घाम कसा काढायचा हे मला माहीत आहे. जेव्हा आत (मनात) आनंद असतो, तेव्हा त्रास कशाला करून घ्यायचा, थंडी कशी वाजेल ? सर्व काही शरीर आणि आत्म्यात आहे.’ असं त्यांनी सांगितलं.

पुढे रामदेव बाबा मजेमजेत म्हणाले की राहुल गांधी यांच्यात प्रचंड जोश आहे. राहुल गांधींनी संसदेत गदारोळ माजवला आहे. राहुल गांधींच्या फिटनेसबद्दलही विचारल्यावर योग गुरू म्हणाले की, “जर तुम्हाला दोघांचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं असेल, तर एकमेकांसमोर उभं करा. त्यातून त्यांची युद्धकला आणि कुस्तीमधील निपुणता दिसून येईल. जर एकमेकांना नॉकआऊट करू शकले, तर ताकद स्पष्ट होईल. पण मला एक गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे, फिटनेस असलाच पाहिजे”.  राहुल गांधी यांच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की, त्यांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवावी आणि आपला राजकीय संघर्ष सुरू ठेवावा, कारण लोकशाही ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्याही ताकदीवर अवलंबून असते. माझ्या त्यांना शुभेच्छा , असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.

माझ्या कर्तव्यापासून मला कोणीही परावृत्त करू शकत नाही

पुढे बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, मला सांसारिक जीवनातील उलथापालथीची पर्वा नाही. जग जरी माझ्या विरोधात गेलं, तरी कोणीही मला माझ्या कर्तव्यापासून परावृत्त करू शकत नाही. “मतदार नव्हे, तर नेते बना., असं त्यांनी लोकांना सांगितलं. जेव्हा तुम्ही आतून दुर्बळ नसता, तेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त असावे, असं मला वाटतं. दुबळे राहू नका, बलवान बना असं वेदात सांगितलं आहे. दुबळं रहाल तर जग तुम्हाला मारून टाकेल. जग तुम्हाला तसंही जगू देणार नाही. ज्या जाती, वर्ग, समुदाय आणि राष्ट्रे शक्तिहीन होऊन बळी पडतात, त्यांचा नाश होतो.” असं त्यांनी सांगितलं.

पतंजली जगातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनेल

पतंजलीच्या रशियासोबतच्या कराराबद्दल बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, भारताची तत्त्वं आणि भारतीय उत्पादनं या दोन्हींना परदेशात मागणी आहे. ही मागणी आणखी वाढणार आहे, कारण भारत भांडवलशाही किंवा हुकूमशाहीच्या विचारधारेला मानत नाही. भारत जगाला बाजारपेठ नव्हे, तर आपलं कुटुंब मानतो. त्याच भावनेने, संपूर्ण जग नैसर्गिक औषध आणि अध्यात्माची संकल्पना स्वीकारत आहे. आज आम्ही दावा करतो की, एक दिवस पतंजली जगातील सर्वात मोठा एफएमसीजी (Fast-Moving Consumer Goods) ब्रँड बनेल आणि हे भारतासाठी नक्कीच घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत