AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : बाळासाहेबांची वाट सोडून विरोधी मार्गावर चाललात, शिंदेंच्या आरोपावर उद्धव ठाकरेंच उत्तर काय?

Uddhav Thackeray : "ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. देशाचं सरकार चालवतंय कोण?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Uddhav Thackeray : बाळासाहेबांची वाट सोडून विरोधी मार्गावर चाललात, शिंदेंच्या आरोपावर उद्धव ठाकरेंच उत्तर काय?
Uddhav Thackeray
| Updated on: Aug 07, 2025 | 11:42 AM
Share

उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. वेगवेगळ्या मुद्यांवर मतं मांडताना त्यांनी मनसेसोबत संभाव्य युती आणि एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी यावरही भाष्य केलं. राज ठाकरेंबाबत चर्चा होणार का? “राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमचं बघू” तुम्ही दिल्लीत आहात त्याचवेळी एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, बाळासाहेबांना ज्यांनी विरोध केला त्या मार्गाने तुम्ही निघाले आहात. आम्ही लोक कल्याणकारी मार्गाने निघालो आहोत. “त्यांचे विचार आणि त्यांना उत्तर द्यायला ते महान नाहीत. गद्दारांना मी किंमत देत नाही. त्यांच्या मालकांना ते भेटायला आले असतील तर त्यावर काय बोलू शकतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय, त्यावर उद्धव ठाकरे बोलले आहेत. “याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. देशाचं सरकार चालवतंय कोण?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

‘पंतप्रधान देशाचे असते तर पहलागमला गेले असते’

“शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. तेव्हा मी मत व्यक्त केलं होतं. आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. हे सध्या भाजपचे आहेत. पहलगाम हल्ला झाला तेव्हा मोदी बिहारला गेले. एखादा पंतप्रधान पहलगामला गेले असते. हे प्रचार मंत्री. पंतप्रधान देशाचे असते तर पहलागमला गेले असते. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय आहे. यांना पररराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती अपयशी ठरली आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये अपयशी ठरलं’

“कोणतंही खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारणार असताना मोदी चीनला जातात. चीनलाही मित्रासाठी नवीन डोअर उघडण्यासाठी जात आहेत. हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये अपयशी ठरलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.