AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या धरणाच्या विधानाची आठवण करून देणारं भाजप मंत्र्याचं धक्कादायक विधान, मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले?

Water Crisis : पाणी टंचाई महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेली आहे. काही वर्षांपूर्वी अजितदादांच्या धरणाविषयीच्या विधानाने राज्यातच नाही तर देशात खळबळ माजवली. आता भाजप नेत्याने पाणी टंचाईवर त्यांची असंवेदनशीलता दाखवली, काय म्हणाले हे मंत्री महोदय?

अजितदादांच्या धरणाच्या विधानाची आठवण करून देणारं भाजप मंत्र्याचं धक्कादायक विधान, मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले?
भाजप नेत्याच्या विधानाने ओढवला वाद
| Updated on: May 28, 2024 | 9:16 AM
Share

तर दुष्काळ हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशातील अनेक भागांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. अनेक योजना आल्या आणि इतिहासजमा झाल्या. त्यातून मोठी फलनिष्पती झालेली नाही. काही वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा असताना अजितदादा यांच्या धरणाच्या विधानाने मोठा गदारोळ झाला होता. देशात त्यांच्या विधानाचे पडसाद उमटले होते. आता या भाजप नेत्याचे विधान चर्चेत आले आहे.

राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट

राजस्थानमध्ये तीव्र जलसंकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्यातील काही भागात पारा 50 अंशांच्या घरात गेल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेक शहरात पाणी पुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. भर उन्हाळ्यात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकार पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत आहे. पण पिण्याचे पाणीच पिळत नसल्याची ओरड होत आहे.

मी फुक मारुन पाणी कसे आणू?

पाण्यावरुन राजस्थानमध्ये महाभारत होत असताना राजस्थानचे मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मी फुक मारुन पाणी घेऊन येऊ, वा हनुमानसारखं लागलीच पाणी आणू, असं शक्य नाही’, असे विधान त्यांनी केले. जितके पाणी आहे, तितका पुरवठा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. लोकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.

पाण्याची नासाडी करेल, त्यावर कारवाई

यंदा राजस्थानमध्ये तापमानाने कहर केला आहे. उष्णतेने अनेकांचे मृत्यू ओढावले आहेत. याकाळात पाण्याची नासाडी करताना कोणी आढळला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चौधरी यांनी दिला. जिथे पिण्याच्या पाण्याची गरज आहे, तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

‘पारा’ चढला

राजस्थानमध्ये तापमान वाढले आहे. रविवारी उष्णतेमुळे एकाचा मृत्यू झाला. सोमवारी फलोदीत तापमान 49.4 डिग्री सेल्सिअसवर पोहचले. बाडमेरमध्ये 49.3 डिग्री, जेसलमेरमध्ये 48.7 डिग्री, पिलानीमध्ये 48.5 डिग्री, करोलीमध्ये 48.4 डिग्री, गंगानगरमध्ये 48.3 डिग्री, बिकानेर-कोटा-फतेहपूरमध्ये 48.2 डिग्री, धोलपूरमध्ये 48.1 डिग्री आणि चूरूमध्ये 48 डिग्री सेल्सिअस इतका पारा चढला होता. राजधानी जयपूरमध्ये तापमान 46.4 डिग्री सेल्सिअस होते.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?