AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू यांचा हा फोटो म्हणजे हिरा पारखण्यातील मोठी चूक, पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजपच्या राजकीय आयुष्यातील हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे.

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू यांचा हा फोटो म्हणजे हिरा पारखण्यातील मोठी चूक, पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती
Suvendu Adhikari
| Updated on: May 09, 2026 | 11:36 AM
Share

भाजपच्या राजकीय आयुष्यातील आज ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा आज शपथग्रहण सोहळा आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. तिथल्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आज पहिल्यांदा शपथ ग्रहण सोहळ्याच आयोजन करण्यात आलं आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी म्हणजे एकप्रकारे पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती आहे. सुवेंदू यांचं मुख्यमंत्री बनणं हे बरच काही शिकवून जाणारं आहे.’हिरे की परख सिर्फ जोहरी को होती है’, हे हिंदीत एक वाक्य आहे. सुवेंदू यांचा शपथविधीचं दृश्य पाहून त्याची आठवण होते. सुवेंदू यांच्या शपथविधी आधी इतिहासाची पानं चाळली तर याची सुरुवात काँग्रेसपासून होते. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेसच्या. पण काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याने त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तृणमुल काँग्रेस. रस्त्यावरची लढाई, राजकीय संघर्ष करुन त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.

आजचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या राजकीय तालिमीत तयार झाले. ते आधी तृणमुल काँग्रेसमध्ये होते. ममता बॅनर्जी यांचा डावा हात मानले जायचे. त्यांनी तृणमुल काँग्रेसमधून मंत्रीपद भूषवलं. पुढे 2020 साली ममता बॅनर्जी यांच्यासोबत मतभेद झाल्याने ते भाजपात गेले. आता त्यांनी भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं. पक्षाने त्याची परतफेड म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं. ‘हिरे की परख सिर्फ जोहरी को होती है’ या वाक्याची आठवण होण्यामागचं कारण हेच आहे. ममता बॅनर्जी यांची किंमत काँग्रेसला कळली नाही, तसच पुढे जाऊन ममता यांना सुवेंदू यांची क्षमता लक्षात आली नाही. अमित शाह यांच्यासारखे जोहरीने हिच गोष्ट हेरली आणि भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्तेपर्यंत पोहोचवलं.

15 वर्षांची सत्ता उलथवून मिळवलं यश

सुवेंदू अधिकारी यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित आहेत. त्याशिवाय एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आले आहेत. आज गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर यांची जयंती आहे. हाच दिवस भाजपने शपथविधीसाठी निवडला आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बत 207 जागांवर विजय मिळवला. म्हणजे भाजपकडे जवळपास दोन तृतीयांश जागा आहेत. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उलथवून भाजपने हे यश मिळवलं आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?