AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

बांकुरातील जॉयपूरच्या TMC कार्यालयात हा बॉम्बस्फोट झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेसच्या आघाडीवर आरोप केलाय.

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप
पश्चिम बंगलाच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट
| Updated on: Mar 26, 2021 | 7:37 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. पण मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बांकुरातील जॉयपूरच्या TMC कार्यालयात हा बॉम्बस्फोट झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेसच्या आघाडीवर आरोप केलाय. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना ही घटना घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.(Bomb blast at TMC office in Joypur, West Bengal)

तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केलंय. “हिंसेची घटना ऐकूण दु:ख झालं. राजकीय तटस्थता कायम ठेवणे आवश्यक आहे आणि कायद्याबद्दल प्रतिबद्धता दर्शविली जाणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा होईल”, असं धनखड यांनी म्हटलंय.

TMCचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

बांकुराच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. TMC नेत्यांनी डावे आणि काँग्रेस आघाडीवर आरोप केलाय. तर भाजपने मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला असावा असं म्हटलंय.

दुसरीकडे TMCच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मोठी हिंसा भडकली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या हिंसाचारात 3 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे. 27 मार्च म्हणजे शनिवारी 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.

पहिल्या टप्प्यात सर्व बूथ संवेदनशील

पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 1 हजार 790 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : ‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

West Bengal Election 2021 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 30 जागांसाठी शनिवारी मतदान

Bomb blast at TMC office in Joypur, West Bengal

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.