AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

बांकुरातील जॉयपूरच्या TMC कार्यालयात हा बॉम्बस्फोट झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेसच्या आघाडीवर आरोप केलाय.

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, TMC नेत्यांचा डावे आणि काँग्रेसवर आरोप
पश्चिम बंगलाच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 26, 2021 | 7:37 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. पण मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. बांकुरातील जॉयपूरच्या TMC कार्यालयात हा बॉम्बस्फोट झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी डावे आणि काँग्रेसच्या आघाडीवर आरोप केलाय. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना ही घटना घडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय.(Bomb blast at TMC office in Joypur, West Bengal)

तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केलंय. “हिंसेची घटना ऐकूण दु:ख झालं. राजकीय तटस्थता कायम ठेवणे आवश्यक आहे आणि कायद्याबद्दल प्रतिबद्धता दर्शविली जाणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा होईल”, असं धनखड यांनी म्हटलंय.

TMCचा डावे आणि काँग्रेसवर आरोप

बांकुराच्या जॉयपूरमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. TMC नेत्यांनी डावे आणि काँग्रेस आघाडीवर आरोप केलाय. तर भाजपने मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात बॉम्ब बनवताना हा स्फोट झाला असावा असं म्हटलंय.

दुसरीकडे TMCच्या कार्यालयात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मोठी हिंसा भडकली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या हिंसाचारात 3 लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे. 27 मार्च म्हणजे शनिवारी 5 जिल्ह्यातील एकूण 30 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यातील बाकुंडा जिल्ह्यातील, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 6, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 7, झाडग्राम जिल्ह्यातील 4 तर पुरुलिया जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत असणार आहे.

पहिल्या टप्प्यात सर्व बूथ संवेदनशील

पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सर्व बूथ संवेदनशील आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 1 हजार 790 मतदान केंद्र आहेत. तर मतदारांची संख्या 73 लाख 80 हजार 942 आहे. सर्व संवेदनशील बूथवर केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान तैनात असणार आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. तर मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात पश्चिम बंगाल पोलीस असणार नाहीत. याबाबत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : ‘मला हिंदू धर्म शिकवू नका, मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी’, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

West Bengal Election 2021 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 30 जागांसाठी शनिवारी मतदान

Bomb blast at TMC office in Joypur, West Bengal

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ