AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election : TMC नेते अभिषेक बॅनर्जींच्या रॅली नंतर भाजपच्या सन्मान यात्रेच्या रथावर हल्ला!

भाजपने आरोप केला आहे की, बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय.

West Bengal Election : TMC नेते अभिषेक बॅनर्जींच्या रॅली नंतर भाजपच्या सन्मान यात्रेच्या रथावर हल्ला!
| Updated on: Mar 16, 2021 | 9:43 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशावेळी पुरुलियामध्ये भाजपच्या प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली आहे. भाजपने आरोप केला आहे की, बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच ड्रायव्हरलाही मारहाण करण्यात आल्याचं भाजपनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या रॅलीनंतर ही तोडफोड करण्यात आली आहे.(Alleged to have attacked BJP’s campaign chariot by Trinamool Congress workers in West Bengal)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोतुलपूरमधील प्रचारसभेला संबोधित करणार आहेत आणि इथेच बाबासाहेब आंबेडकर सन्मान यात्रेची सुरुवात ते करणार होते.

अमित मालवीय यांच्याकडून निषेध व्यक्त

भाजपचे केंद्रीय सह प्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीट करुन या संपूर्ण प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. ‘पुरुलियामध्ये पार्क करण्यात आलेल्या बाबासाहेब आंबेडकर सन्मान रथाची तोडफोड करण्यात आली आहे. ड्रायव्हरही जखमी झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोतुलपूरमधून या यात्रेला हिरवा कंदिल दाखवणार आहेत. तृणमूल काँग्रेस हे सर्व रोखण्यासाठी खूप काही करण्यात सक्षम नाही. ते एवढे का घाबरत आहेत?’, असं ट्वीट मालवीय यांनी केलंय.

राजनाथ सिंह यांची ममता बॅनर्जींवर टीका

ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्याकडून नोकरशाहीवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच कोलकातामध्ये बसून कट रचला जात असल्याचंही ममता यांनी म्हटलंय. त्यावर आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.

‘मां, माटी और मानुष, कुणीही सुरक्षित नाही’

“ममता यांनी सांगितलं होतं की, ‘मां, माटी और मानुष’! पण आज इथं ना मां सुरक्षित आहे, ना मानुष सुरक्षित आहे, ना पश्चिम बंगालची माती सुरक्षित आहे”, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र डागलं. त्यातबरोबर ममता बॅनर्जी या प्रचारादरम्यान अपघातामुळे जखमी झाल्या. त्यांनी भाजपवर आरोप केला. पण तपासात त्यांच्या सुरक्षेत कसूर झाल्यामुळे त्या जखमी झाल्याचं समोर आलं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

संबंधित बातम्या : 

West Bengal Election 2021 : ‘मां, माटी और मानुष’वरुन राजनाथ सिंहांचा ममतांना टोला, सत्ता आल्यास राजकीय हत्या थांबवण्याचाही दावा

West Bengal Election 2021 : ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!

Alleged to have attacked BJP’s campaign chariot by Trinamool Congress workers in West Bengal

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.