सलाम आणि इन्शाल्लाह म्हणाली, पण जयहिंद वंदेमातरम नाही; या IPS अधिकाऱ्यावर झटक्यात…
सोशल मीडियावर एका IPS अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या महिला IPS अधिकाऱ्याने जयहिंद आणि वंदेमातरम या शब्दांचा वापर करण्याऐवजी सलाम आणि इन्शाल्लाह वापर केला.

पश्चिम बंगालमध्ये खडगपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) आणि २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांची सोमवार (१४ सप्टेंबर) रोजी बदली करण्यात आली. त्यांना राज्य सशस्त्र पोलिसात डेप्युटी कमांडंट पदावर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पार्थ घोष जबाबदारी सांभाळतील. बानो यांची बदली एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी झाली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यूपीएससी उमेदवारांना प्रोत्साहन दिले होते आणि सोशल मीडियावर त्याची टीका झाली होती.
खरं तर हा वाद बुशरा बानो यांच्या इंटरनेटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे सुरू झाला होता. व्हिडीओमध्ये बुशरा यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या निवासी कोचिंग अकादमी आणि स्पर्धा परीक्षांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की यूपीएससीच्या तयारीत कोचिंग अकादमीने कशी मदत केली.
अस्सलामुअलैकुम, इन्शाअल्लाह बोलण्यावरून वाद
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी म्हणून बुशरा बानो यांनी तिथून मिळालेल्या सहकार्याचाही उल्लेख केला. त्यांनी आपल्या व्हिडीओची सुरुवात अस्सलामुअलैकुमने केली तर शेवटी त्यांनी इन्शाअल्लाह आणि जजाकल्लाह यांसारख्या शब्दांचा वापर केला होता. यावरूनच वाद निर्माण झाला आणि प्रश्न विचारले जाऊ लागले.
सोशल मीडियावर उठले प्रश्न
व्हिडीओ समोर आल्यानंतर काही लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या भाषेबाबत प्रश्न उपस्थित केले. काही युजर्सनी आरोप केला की त्यांनी व्हिडीओची सुरुवात अस्सलामुअलैकुमने केली, मध्ये इन्शाअल्लाहचा वापर केला आणि शेवटी जजाकल्लाह म्हटले, पण जय हिंद किंवा वंदे मातरम् यांसारख्या राष्ट्रीय अभिवादनांचा वापर केला नाही.
गृह सचिवांकडे तक्रार
हिंदू लीगल फंड नावाच्या एका वेबसाइटने व्हिडीओबाबत बंगालच्या गृह सचिवांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांनी अस्सलाम वालेकुमने सुरुवात केली, इन्शाल्लाहचा वापर केला आणि जजाकल्लाह म्हणून व्हिडिओ संपवला, पण त्यांनी वंदे मातरम् किंवा जय हिंद यांचा वापर केला नाही. तक्रारीत म्हटले आहे की ‘भारत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका सेवारत अधिकाऱ्याने निष्पक्षता राखली पाहिजे आणि सार्वजनिक संवादात राष्ट्रीय अभिव्यक्तींचा वापर केला पाहिजे. आम्ही योग्य पुनरावलोकन आणि कारवाईची मागणी करतो.’
