AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी कोणती गोष्ट आहे? ज्यासाठी भारत आजही पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून, 80 टक्के भारतीय कुटुंबात दररोज वापरली जाते

दैनंदिन गरजांसाठी आणि छोट्या-छोट्या वस्तूंसाठी देखील इतर देशावर अवलंबून राहण्याची वेळ सध्या पाकिस्तानवर आहे. मात्र तरी देखील एक अशी वस्तू आहे, तीची आयात भारत पाकिस्तानकडून करतो.

अशी कोणती गोष्ट आहे? ज्यासाठी भारत आजही पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून, 80 टक्के भारतीय कुटुंबात दररोज वापरली जाते
| Updated on: Nov 02, 2024 | 6:25 PM
Share

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच देशाच्या फाळणीचा निर्णय घेण्यात आला होता. भारताला 15 ऑगस्ट 19947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती झाली.सुरुवातीपासूनच पाकिस्तान हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाले. मात्र दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरूच राहिला. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दैनंदिन गरजांसाठी आणि छोट्या-छोट्या वस्तूंसाठी देखील इतर देशावर अवलंबून राहण्याची वेळ सध्या पाकिस्तानवर आहे. मात्र दुसरीकडे भारतानं स्वयंमपूर्णतेकडे मोठं पाऊल टालं आहे. आज अनेक वस्तुंची भारतातून निर्यात होते. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या आजही पाकिस्तानमधून भारतात येतात.पाकिस्तानमधून भारतात ज्या वस्तुंची आयात होते.

त्यात पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे काळं मीठ, काळ्या मिठाची मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून भारतात आयात होते.काळ्या मिठासाठी भारत पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे.भारतामध्ये काळ्या मिठाचं उत्पदन खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे भारत त्यासाठी पूर्णपणे पाकिस्तानवर अवलंबून आहे. परंतु आता भारतामध्ये देखील काळ्या मिठाचं उत्पादन काही प्रमाणात होण्यास सुरुवात झाली असून, भारतानं याबाबत पाकिस्तानवरील अवलंबित्व काही प्रमाणत कमी केलं आहे.भारतामध्ये होणारे विविध धार्मिक कार्यक्रम,व्रतांमध्ये काळ्या मिठाची गरज असते. काळ्या मिठाला रॉक सॉल्ट नावानं देखील ओळखलं जातं.जेव्हा समुद्राचं खारं पाणी हे सोडियम क्लोराइडच्या रंगीत क्रिस्टलमध्ये रुपांतरी होतं,त्यापासून या काळ्या मिठाची निर्मिती केली जाते.पाकिस्तानमध्ये काळ मिठ हे दोन ते तीन रुपये किलोने विकलं जातं, मात्र भारतामध्ये त्याची किंमत 50 ते 60 रुपये किलो एवढी आहे.

काळ्या मिठाचा इतिहास

काळ्या मिठाला रॉक सॉल्ट असंही म्हटलं जातं.काळ मिठ हे खड्यांच्या स्वरुपात आढळून येत त्यामुळे त्याला रॉक सॉल्ट असं म्हणतात. काळ्या मिठाला हिंदीमध्ये सेंधा नमक असं म्हणतात. सिंधू नदीच्या परिसरात ते आढळून आल्यानं त्याचं नाव सिंधूवरून सेंधा नमक असं पडल्याचा इतिहास आहे.पाकिस्तानच्या झेलम प्रांतामध्ये काळ्या मिठाची सर्वाधिक निमिर्ती केली जाते.

Follow Us
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....