AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री बेगमचा आत्मा फिरतो, ‘या’ राजवाड्यात रात्रीस खेळ चालतो, भयानक आवाज येतात

अवधच्या राजघराण्याचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या बेगम विलायत महाल यांचा आत्मा अजूनही फिरत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे मत आहे. असे म्हटले जाते की, बेगमने 1993 मध्ये चिरलेले हिरे गिळले आणि आपला जीव घेतला. त्यानंतर 10 दिवस त्यांचा मृतदेह पडून होता.

रात्री बेगमचा आत्मा फिरतो, ‘या’ राजवाड्यात रात्रीस खेळ चालतो, भयानक आवाज येतात
Malcha MahalImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 15, 2025 | 5:41 PM
Share

भारताची राजधानी दिल्लीत लाल किल्ला, इंडिया गेट, कुतुब मिनार सह अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत जी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. इतकंच नाही तर इथला गजबजलेला बाजारही खूप प्रसिद्ध आहे, पण आज आम्ही तुम्हाला दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये असलेल्या एका भुताच्या राजवाड्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचं नाव आहे ‘मालचा महल’.

एकेकाळी अवधची राणी विलायत महाल आपला मुलगा प्रिन्स अली रझा आणि राजकुमारी सकीना यांच्यासमवेत 40 वर्ष या राजवाड्यात वास्तव्यास होती. सरदार पटेल मार्गाजवळ सेंट्रल रिजमध्ये असलेला हा राजवाडा सुमारे 700 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब प्रकाश आणि पाण्याविना राहत होते. मात्र, कालांतराने या राजवाड्याचे रूपांतर दिल्लीतील भुताच्या राजवाड्यात झाले. चला जाणून घेऊया त्याबद्दल.

‘मालचा महल’ कुठे आहे?

‘मालचा महल’ दिल्लीतील चाणक्यपुरी येथे आहे. ते 14 व्या शतकात बांधले गेले. अवधच्या राजघराण्याचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या बेगम विलायत महाल यांचा आत्मा अजूनही जिवंत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे मत आहे. असे म्हटले जाते की बेगमने 1993 मध्ये चिरलेले हिरे गिळले आणि आपला जीव घेतला. त्यानंतर 10 दिवस त्यांचा मृतदेह पडून होता.

‘मालचा महाल’ची धोकादायक चाल

सरकारने काही काळापूर्वी दिल्लीतील मालचा महलसाठी हॉर्न वॉक सुरू केला होता, जो आता बंद करण्यात आला आहे. दिल्ली टुरिझमने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये या पॅलेससाठी चालण्याची वेळ संध्याकाळी 5.30 ते 7 अशी निश्चित करण्यात आली होती. जिथे प्रत्येक व्यक्तीचे प्रवेश शुल्क 800 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

इथल्या पायऱ्यांवरील अंधार आणि राजवाड्याच्या आतून येणारे भीतीदायक आवाज अतिशय भीतीदायक असल्याचे ज्यांनी या वॉकचा अनुभव घेतला आहे, त्यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर आजूबाजूला घनदाट झाडांनी वेढलेल्या या परिसरात माकडं, गिधाडांसह अनेक प्राणी पाहायला मिळाले आहेत.

राजवाड्यातून भीतीदायक आवाज येतो

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगम विलायत महल यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांनी मृतदेह दफन करण्याऐवजी त्यावर लेप लावून तो व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार झाले नाहीत, त्यामुळे आजही त्यांचा आत्मा येथे भटकतो, असे लोकांना वाटते. राजवाड्याकडे जाण्याचा मार्ग अतिशय निर्जन आणि भीतीदायक आहे. इतकंच नाही तर आजही राजवाड्यातून भीतीदायक आवाज येत असल्याचं इथले स्थानिक सांगतात.

राजवाड्यात जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर पायपीट करावी लागते, त्यानंतर पायऱ्यांच्या साहाय्याने वर जावे लागते. थोडे पुढे गेल्यावर परत जाण्याचा मार्ग नाही कारण त्याची रचना अशी आहे. राजवाड्याभोवतीचे भीतीदायक आवाज ऐकून कोणालाही भीती वाटेल.

महलमध्ये वास्तव्य करणारी शेवटची व्यक्ती प्रिन्स अली रझा

मालचा महलमध्ये वास्तव्य करणारी शेवटची व्यक्ती प्रिन्स अली रझा होती, जो अवधचा शासक असल्याचा दावा करत होता, जो बेगम विलायत महलचा मुलगा होता. 2 सप्टेंबर 2017 रोजी तो राजवाड्यात मृतावस्थेत आढळला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अज्ञात आजाराशी झुंज देत त्यांचे निधन झाले. आज हा महाल जीर्ण अवस्थेत आहे. लोक इथे जायला घाबरतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!