AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते, कित्येकजण तुरुंगात खितपत पडलेत’

कित्येकजण सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. इतरांना अनेक महिने सुनावणीची तारीख मिळत नाही. |

'अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते, कित्येकजण तुरुंगात खितपत पडलेत'
| Updated on: Nov 11, 2020 | 12:53 PM
Share

नवी दिल्ली: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे. (Arnab goswami bail plea in supreme court)

दुष्यंत दवे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. याचिकांचा क्रम ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काही नियमच नाही. अर्णव गोस्वामी यांच्या जामिनाच्या याचिकेवर इतक्या तातडीने सुनावणी घेतली जाते. मात्र, कित्येकजण सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडले आहेत. इतरांना अनेक महिने सुनावणीची तारीख मिळत नाही. मग अर्णव यांनाच दरवेळी लगेच कशी तारीख मिळते, असा परखड सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. उच्च न्यायालय अनेकदा व्यक्तीस्वातंत्र्याची बाजू घेत नाही. आत्महत्या प्रकरणाचा जरुर तपास व्हावा. त्यामुळे राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करत असेल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असे मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या:

Ram Kadam | अर्णव गोस्वामीच्या सुटकेसाठी भाजप आमदार राम कदमांचं राष्ट्रपतींना पत्र

अर्णव गोस्वामी अटक प्रकरण : भाजप नेत्याचे थेट सरन्यायाधीशांना पत्र; मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Navi Mumbai | अर्णव गोस्वामींच्या अटकेचा नागरिकांकडून जल्लोष, पोलिसांना फूल-मिठाई देत आभार व्यक्त

(Arnab goswami bail plea in supreme court)

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.