AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी सकाळी उशीरा उठते, ऑफीसला उपाशीपोटीच जावं लागतं – पतीची तक्रार ऐकून पोलिसांनी डोक्यावर मारला हात !

नवरा-बायकोचं नात म्हटलं की भांडण हे आलंच, कधी ते लुटूपुटूचं असतं तर कधी खरंच उग्र रूप धारण करतं. पण घरोघरी मातीच्या चुली.. या म्हणीप्रमाणेच प्रत्येक घरात पती-पत्नीमध्ये मतभेद हे होतच असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये पत्नीच्या वागण्यामुळे कंटाळून एका पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पण त्याने सांगितलेली तक्रार ऐकून अधिकारी हैराण झाले

पत्नी सकाळी उशीरा उठते, ऑफीसला उपाशीपोटीच जावं लागतं - पतीची तक्रार ऐकून पोलिसांनी डोक्यावर मारला हात !
| Updated on: May 07, 2024 | 1:00 PM
Share

नवरा-बायकोचं नात म्हटलं की भांडण हे आलंच, कधी ते लुटूपुटूचं असतं तर कधी खरंच उग्र रूप धारण करतं. पण घरोघरी मातीच्या चुली.. या म्हणीप्रमाणेच प्रत्येक घरात पती-पत्नीमध्ये मतभेद हे होतच असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये पत्नीच्या वागण्यामुळे कंटाळून एका पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पण त्याने सांगितलेली तक्रार ऐकून अधिकारी हैराण झाले आणि त्यांनी डोक्यालाच हात मारला. बायकोची तक्रार करण्यासाठी त्याने थेट पोलिस स्टेशन गाठलं. माझी पत्नी रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरते , आणि सकाळी उशीरा उठते. त्यामुळ मला ऑफीसमध्ये उपाशीपोटी जायला लागतं, अशी तक्रार त्याने पोलिसांसमोर केली. पत्नी सकाळी उठेपर्यंत तिचा पती ऑफीसमध्ये पोहोचलेला असतो.

या सवयीला कंटाळून पतीने त्याच्या पत्नीपासून वेगळे होण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. पत्नीपासून सुटका हवी आहे, अशी विनंती पतीने पोलिस ठाण्यात केली. वेळेवर जेवण न मिळाल्याने माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. जी मला वेळेवर जेवणही देऊ शकत नाही, अशा बायकोसोबत मला रहायचच नाही असं सांगत त्याने विभक्त होण्याची मागणी केली. मात्र त्या तरुणाचं बोलणं ऐकून अधिकारी हैराण झाले. तरीही त्यांनी आधी गुन्हा दाखल केला आणि नंतर पती-पत्नी दोघांनाही समजावून, शांत करून घरी पाठवले.

एवढुशा गोष्टीवरून थेट पोलिसांत जातात लोकं

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल अशा अनेक घटना समोर येत आहेत ज्यात क्षुल्लक कारणावरून पती-पत्नी पोलिस ठाण्यात पोहोचतात. काही प्रकरणं अशी असतात जिथे समजूत घालून, मन वळवून प्रकरण मिटवले जाते, पण काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करावे लागतात. एका आकडेवारीनुसार, 1500 प्रकरणांमध्ये समजावून वाद मिटवण्यात आला, तर 400 प्रकरणे अशी आहेत ज्यासाठी गु्न्हा दाखल करण्यात आला.

कधी भांडणामुळे, तर कधी पत्नी माहेरी गेल्यामुळे तर कधी पती अतिशय बिझी असल्यामुळे नवरा-बायकोत भांडण होतात आणि ते तक्रार घेऊन पोलिसांत येतात. काही वेळा समजावून तो वाद सोडवला जातो आणि प्रकरण तिथेच मिटतं. पण काही वेळा असं होतं की पती-पत्नी दोघंही ऐकायला तयार नसतात, कोणत्याही गोष्टीत समहती होत नाही अशा वेळी केस नोंदवली जाते, असे पोलिसांनी नमूद केले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला