AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाह ! 160 किमीचा वेग, तेजस आणि शताब्दी एक्सप्रेस वंदेभारतसारखी धावणार

वंदेभारत एक्सप्रेसने रेल्वे प्रवासाचे सारे आयाम बदलले आहेत. आता वंदेभारत सारखाच वेग आता तेजस आणि शताब्दी एक्सप्रेस देखील गाठणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. पाहा कोणत्या मार्गावर हा बदल होणार आहे.

वाह ! 160 किमीचा वेग, तेजस आणि शताब्दी एक्सप्रेस वंदेभारतसारखी धावणार
Vande bharat expressImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 16, 2024 | 6:50 PM
Share

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : आता रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवास घडविण्यासाठी भारतीय रेल्वे सतत प्रयत्न करीत आहे. रेल्वे लवकरच लांबपल्ल्याच्या ट्रेनचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि सिंगल यंत्रणेचे आधुनिकीकरण करीत आहे. रेल्वे आता मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील तेजस एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेसची वेग दर ताशी 160 किमी होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर मार्च महीन्यांपासून ही सेवा सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद मार्गाचे आधुनिकीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. प्रमुख कामे पूर्ण झाली असून मार्चपासून या मार्गावरील ट्रेनच्या वेगात वाढ होणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले. सुरुवातीला केवळ तेजस, शताब्दी आणि वंदेभारत सारख्या प्रिमियम दर्जाच्या ट्रेनचा वेग वाढणार आहे. या ट्रेनचा वेग दर ताशी 160 किमी होणार आहे. त्यानंतर एलएचबी डब्यांच्या ट्रेन या वेगाने चालविले जाणार असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनमधून सरासरी 170 लांबपल्ल्याच्या ट्रेन धावतात. ज्यात 120 लांबपल्ल्याच्या ट्रेन एलएचबी या आधुनिक डब्यांनी सुसज्ज आहेत.

किती वेळ वाचणार

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गांवरील ट्रेनचा वेग वाढल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या वेळेत सरासरी 30 मिनिटांची बचत होण्याची आशा आहे. सध्या लांबपल्ल्याच्या ट्रेन मुंबई सेंट्रल ते बोरीवली पर्यंत दर ताशी 100 किमीच्या वेगाने तर बोरीवली ते विरारपर्यंत 110 किमी वेगाने तर विरार ते अहमदाबाद दरम्यान 130 किमी वेगाने चालविण्यात येतात. मार्चपासून वाढलेला वेगाचा फायदा विरारपासून पुढे लागू होणार असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...