AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंबद्दल महत्वपूर्ण निर्णय; दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा सगळा इतिहास सांगितला…

ज्या वेळी क्रीडा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी सांगितले की, 15 जूनपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांकडे आपल्यावर नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंबद्दल महत्वपूर्ण निर्णय; दिल्ली पोलिसांनी प्रकरणाचा सगळा इतिहास सांगितला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 15, 2023 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या कुस्तीपटूने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. या खेळाडूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभादिवशीच जंतरमंतरहून संसद भवनाच्या दिशेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

त्या गोंधळानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी या आंदोलनातील कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र आता दिल्ली पोलिसांकडूनच दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.

देशात हुकूमशाही आहे का?

ज्या कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांचा त्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे. कुस्तीपटूंविरुद्ध गुन्हा दाखल केल्या नंतर ब्रिज भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलिसांना सात दिवस लागले होते. याविषयी बोलताना कुस्तीपटूंनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्या खेळांडूंविरुद्ध मात्र गुन्हा नोंदवायला सात तासही लागले नाहीत. त्यामुळे देशात हुकूमशाही आहे का? असा सवाल खेळाडूंनी उपस्थित केला होता.

देशाच्या इतिहासात नोंद

त्यामुळे हे सरकार खेळाडूंबरोबर कशा पद्धतीने वागणूक देत आहे, त्याची या देशाचा इतिहास नोंद घेईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. बजरंग पुनियांनी गुन्हा दाखल झाल्यानंतरची परिस्थित सांगताना म्हणाले की, पोलिसांनी मला त्यांच्या कोठडीत ठेवले होते. मात्र त्यावेळी ते काहीच सांगत नव्हते.

क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंविरुद्ध भादंवि कलम 147, 149, 186, 188, 322 आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर एफआयआर रद्द करण्याची मागणी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे करण्यात आली होती. ज्या वेळी क्रीडा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटूंनी सांगितले की, 15 जूनपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांकडे आपल्यावर नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद