AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगावच्या सीमाभागातील मराठी भाषिकांचं दुःख पंतप्रधानांकडे मांडलं जाणार; ‘या’ समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

कन्नडिगांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय अत्याचार केले जात असल्यामुळेच हे दुःख आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

बेळगावच्या सीमाभागातील मराठी भाषिकांचं दुःख पंतप्रधानांकडे मांडलं जाणार; 'या' समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 29, 2022 | 10:27 PM
Share

बेळगावः गेल्या कित्येक वर्षांपासून कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून नेहमीच अन्याय, अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आता सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यामध्ये बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.

त्यामुळे बेळगावसह सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख आणि कन्नडिगांकडून केला जाणारा अन्याय अत्याचाराची माहितीही पंतप्रधानांना सांगणार असल्याचे मत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यामुळे सीमावादावर 24 नोव्हेंबर रोजी ठिणगी पडली होती.

त्यातून सीमावादावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून जोरादार वादंग माजला होता. दोन्ही राज्यात बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांचे आर्थिक नुकसानही करण्यात आले होते.

सीमावादावरून जोरदार वादंग सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन हे वातावरण आणखी चिघळत ठेवले होते.

त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या सगळ्याचा वृत्तांत सांगण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीकडून पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

कन्नडिगांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय अत्याचार केले जात असल्यामुळेच हे दुःख आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ