AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगावच्या सीमाभागातील मराठी भाषिकांचं दुःख पंतप्रधानांकडे मांडलं जाणार; ‘या’ समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

कन्नडिगांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय अत्याचार केले जात असल्यामुळेच हे दुःख आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

बेळगावच्या सीमाभागातील मराठी भाषिकांचं दुःख पंतप्रधानांकडे मांडलं जाणार; 'या' समितीने घेतला महत्वपूर्ण निर्णय...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 29, 2022 | 10:27 PM
Share

बेळगावः गेल्या कित्येक वर्षांपासून कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून नेहमीच अन्याय, अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे आता सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्यामध्ये बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.

त्यामुळे बेळगावसह सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांचे दुःख आणि कन्नडिगांकडून केला जाणारा अन्याय अत्याचाराची माहितीही पंतप्रधानांना सांगणार असल्याचे मत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यामुळे सीमावादावर 24 नोव्हेंबर रोजी ठिणगी पडली होती.

त्यातून सीमावादावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून जोरादार वादंग माजला होता. दोन्ही राज्यात बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले होते. महाराष्ट्रातील अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांचे आर्थिक नुकसानही करण्यात आले होते.

सीमावादावरून जोरदार वादंग सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन हे वातावरण आणखी चिघळत ठेवले होते.

त्यातच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. या सगळ्याचा वृत्तांत सांगण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीकडून पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

कन्नडिगांकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय अत्याचार केले जात असल्यामुळेच हे दुःख आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून वेळ मागवून घेण्यात आला आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी