AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar: शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर चर्चांना उधाण

खरं तर रश्मी ठाकरेंबद्दलच वक्तव्य असो की युतीवरुन, अब्दुल सत्तार फारच चकीत करणारे बोलले आणि पक्षालाच बुचकळ्यात पाडणारी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना तात्काळ शिवसेना स्टाईलनं समज देत, तुम्ही काँग्रेसमधून आलात हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय.

Abdul Sattar: शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर चर्चांना उधाण
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 06, 2022 | 1:09 AM
Share

मुंबई : रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असं धाडसी वक्तव्य शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांनी केलं आणि महाराष्ट्रभर चर्चांना उधाण आलं. मात्र खुद्द संजय राऊतांनी अब्दुल सत्तारांचे कानही टोचले आणि उद्धव ठाकरेच पूर्ण 5 वर्षे मुख्यमंत्री राहतील, असा दावा केला. सत्तार सेनेची भूमिका मांडत नाही, 5 वर्षे उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अब्दुल सत्तार फक्त रश्मी ठाकरेंबद्दलच बोलले असं नाही तर नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात, असंही बोलले. त्यामुळं शिवसेनेचे मंत्रीच असं बोलत असल्यानं, चलबिचल निर्माण होणं साहजिकच होतं. त्यावरुन संजय राऊतांनी आपल्याच मंत्र्यांचा समाचार घेतला. सत्तारांना अजून शिवसेनेची हळद लागायची आहे, असे राऊत म्हणाले. तर चंद्रकांत खैरे यांनीही सत्तारांचे कान टोचले आहेत. सत्तारांना बोलण्याचा अधिकारच नाही, शिस्त पाळावी असे खैरे यांनी म्हटले आहे.

फडणवीसांनीही युतीच्या वक्तव्याची हवा काढली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही चांगलाच चिमट काढला. नया है वह, म्हणत फडणवीसांनी, सत्तारांच्या युतीच्या वक्तव्याची हवा काढली. नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात असं सत्तारांना वाटतं याचा मला अतिशय आनंद आहे. पण अब्दुल सत्तार नया है वह. त्यांना काय माहीत आहे शिवसेना. काहीच माहीत नाही सेनेचं. मला तर असं वाटतं की, गेल्या पाच सात महिन्यात ते कधी उद्धवजींनाही भेटले नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्त्वाचा माणूस लागतो ना, असं फडणवीस म्हणाले.

दानवेंनीही चिमटे काढण्याची संधी सोडली नाही

बरं गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात, असं सत्तार बोलले. त्यानंतर दिल्लीत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली. आता ही भेट जळगाव-सोलापूर रेल्वेसाठी घेतल्याचं सत्तार म्हणाले. तर दानवेंनी सत्तारांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

शिवसेना नेत्यांनीही शिवसेना स्टाईलने दिली समज

सत्तार हे शिवसेनेचे राज्य मंत्री आहे. खरं तर रश्मी ठाकरेंबद्दलच वक्तव्य असो की युतीवरुन, अब्दुल सत्तार फारच चकीत करणारे बोलले आणि पक्षालाच बुचकळ्यात पाडणारी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांना तात्काळ शिवसेना स्टाईलनं समज देत, तुम्ही काँग्रेसमधून आलात हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पक्षासंदर्भात किंवा राज्यात मोठा निर्णय घ्यायचा असेल तर शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरेच बोलतात. मात्र राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद आणि युतीवरुन जी काही वक्तव्य केली. त्यावरुन सत्तारांना शिवसेनेच्या नेत्यांनीच समज दिलीय. (Political after the uproar Shiv Sena’s Minister of State Abdul Sattar’s statement)

इतर बातम्या

‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली